ETV Bharat / city

पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

author img

By

Published : Sep 30, 2021, 10:02 AM IST

पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असून पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा आणि शहरे कार्बन न्यूट्रल करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Aditya Thackeray in pune
Aditya Thackeray in pune

पुणे - मानव जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असून पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा आणि शहरे कार्बन न्यूट्रल करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियान 2.0 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

प्रतिक्रिया

शहरात कार्बन उत्सजर्नाचे प्रमाण अधिक आहे. ऊर्जेचा अधिक वापरदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक होतो. त्यामुळे पर्यावरणात वेगाने बदल घडत असून दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षणाचे दीर्घकालीन नियोजन आणि ठोस कृती अपेक्षित आहे. शहरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीदेखील यादृष्टीने अनुकूल बदल अपेक्षित आहेत. शहरातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड आणि प्रदूषण कमी करण्याच्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असेदेखील यावेळी ठाकरे यांनी सांगितले.

'मिशन मोडवर काम करावे' -

सौर ऊर्जेचा वापर, हरित क्षेत्र वाढविणे, जल पुनर्भरण, विघटनशील कचऱ्याचा पुर्नपयोग अशा उपक्रमांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. शाळा-महाविद्यालयातून अपांरपरिक ऊर्जेच्या वापराबाबत माहिती देण्यात यावी. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संयत्र बसवावे. स्वच्छतेवर भर, दैनंदीन सवयीत बदल करून ऊर्जेची बचत आदी उपाययोजनांच्या माध्यमातून मोठा बदल घडवून आणता येईल. या कार्यात महिलांचा सहभागही वाढविणे गरजेचे आहे. उद्योग, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आणि नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी रहाणे गरजचे आहे. तसेच ग्लोबल सिटीझन कार्यशाळेत प्रतिनिधीत्त्व करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आदींची सांगड घालून राज्यात पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक मजबूत करता येईल. त्यासाठी पुणे विभागाने चांगली सुरूवात केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविण्यात येत आहे. वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातही अशीच चांगली कामगिरी करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, अशी अपेक्षा ही यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - पश्चिम बंगालमध्ये आज पोटनिवडणूकीसाठी मतदान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भवितव्य ठरणार

'सिंहगड किल्यावर लवकरच ई-बससेवा' -

माझी वसुंधरा अभियानात विभागातील 430 स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्र वाढविणे, ई-वाहनांचा उपयोग, 2030पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे हे पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचे 90 टक्के एकत्रिकरण करण्यात येणार आहे. मुळा-मुठाच्या संगमावर जलपर्णी मुक्तीचे अभियान लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सिंहगड किल्यावर लवकरच ई-बससेवा सुरू करण्यात येणार असून पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 21 लाख 94 हजार वृक्षारोपण -

माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या वर्षी 21 लाख 94 हजार झाडे लावण्यात आली. 1650 हरित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आणि 237 क्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. 10 हजार 663 टन कंपोस्ट खत तयार करण्यात आले. 6 हजार जुन्या व 3 हजार 500 नवीन इमारतींचे रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यात आले. 11 हजार दशलक्ष लिटर पाणी संवर्धन क्षमता तयार झाली. 775 जलसंस्था स्वच्छ करण्यात आल्या आणि 12 लाख एलईडी बल्ब लावण्यात आले. 736 बायोगॅस आणि 701 सोलर पंप बसविण्यात आले अशी माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा - पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.