IFFI 52 : महोत्सवात प्रादेशिक चित्रपटांना अधिक महत्व देणे गरजेचे - अनुराग ठाकूर

author img

By

Published : Nov 22, 2021, 7:05 AM IST

IFFI 52
चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपटांना अधिक महत्व देणे गरजेचे ()

देशातील प्रादेशिक चित्रपटांना चित्रपट महोत्सवात अधिक महत्व प्राप्त करून देण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते रविवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलत होते.

पणजी - देशातील प्रादेशिक चित्रपटांना (Regional films) चित्रपट महोत्सवात अधिक महत्व प्राप्त करून देण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ते रविवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी रविवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत गोव्यात सुरु असलेल्या इफ्फी 52 (52nd International Film Festival of India, Goa) मध्ये घेण्यात आलेल्या ‘उद्याचे 75 सर्जनशील व्यक्ती’ (75Creative Minds IFFI) या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला.

IFFI 52
चित्रपट महोत्सवात ‘उद्याचे 75 सर्जनशील व्यक्ती’ (75Creative Minds IFFI) या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
“भारतात कौशल्य आणि प्रतिभेची अजिबात कमतरता नाही. या प्रतिभावंत युवकांना (Young Film Makers) फक्त एक संधी हवी होती आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि येत्या काळात त्यांना चित्रपट उद्योगाचे नेतृत्व करता यावे, यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातील भारत@75 यापेक्षा योग्य व्यासपीठ कोणते होते”, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.75 युवा सर्जनशील (75Creative Minds) नवोदित प्रतिभा या इफ्फीमध्ये (IFFI) हजर आहेत, हे सर्व युवा कलाकार (Young Film Makers), अत्यंत भाग्यवान आहेत कारण त्यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकारांशी चर्चा करण्याची, त्यांच्याकडून काही शिकण्याची संधी मिळणार आहे, असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. अनेक नवोदित कलाकारांना खूप परिश्रम करुनही, कित्येक दशके ही संधी मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
52nd International Film Festival of India, Goa
चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपटांना अधिक महत्व देणे गरजेचे
या महोत्सवात आपल्याला, भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या मास्टरक्लासेसमध्ये सहभागी होता येईल. त्यांच्याकडून चित्रपटनिर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या नवनवीन पद्धती शिकता येतील. ज्याला सकस आशयाची जोड देऊन उत्तम चित्रपट निर्मिती करता येईल, असेही ठाकूर पुढे म्हणाले.केंद्रीय मंत्री म्हणाले, "इफ्फी 52 (IFFI 52) मध्ये विविध प्रतिनिधी आणि सहभागींबरोबर झालेल्या संवादात अनेकांनी मला सांगितले की '75 क्रिएटिव्ह माईंड्स' (75Creative Minds) हा अलीकडच्या वर्षांत इफ्फीमध्ये झालेला प्रमुख स्वागतार्ह बदल आहे."त्यांनी युवा विजेत्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांबद्दल ब्लॉग लिहिण्याचे आणि इफ्फी 52 (IFFI 52) मध्ये त्यांचे अभिप्राय आणि शिकण्याबाबतचे अनुभव व्यक्त करण्याचे आवाहन केले.त्यांनी चित्रपट उद्योग आणि ‘ सर्जनशील तरुणांना ’ आपल्या कलेच्या माध्यमातून भारताची क्षमता जगासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.