ETV Bharat / city

याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

author img

By

Published : Sep 9, 2022, 5:57 PM IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विषारी विचार पेरणाऱ्यांचे नकाब आम्ही फाडणारच. मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय, की आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अशा विचारांचा पुढे आणणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी मागणी केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ते आज नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते. The DCM Devendra Fadnavis ordered inquiry in Yakub Memon grave beautification case

प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार

नागपूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विषारी विचार पेरणाऱ्यांचे नकाब आम्ही फाडणारच. मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय, की आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अशा विचारांचा पुढे आणणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी मागणी केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले ordered inquiry in Yakub Memon grave आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली The DCM Devendra Fadnavis ordered inquiry आहे. ते आज नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ही माहिती तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे पोहोचली होती की नाही, आणि त्यांना ही माहिती असेल तर तेव्हा ते काय करत होते. झोपा काढत होते का ? असा संतप्त प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.



मागच्या सरकारच्या हे माहीत होतं का गृहमंत्री रोज मुख्यमंत्र्यांना राज्यात घडणाऱ्या घटनांची मुख्यमंत्र्यांना देत असतात. ही माहिती गृहमंत्र्यांना होती का, त्यांनी माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ती दिली होती का ? हे तपासावे लागेल असंही ते म्हणाले आहेत. जर त्यांना ही माहिती असेल तर तत्कालीन सरकारने पायबंद का केला नाही, याची माहिती समोर आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.


काँग्रेसकडे माहितीचा अभाव काँग्रेसच्या प्रवक्त्याला याकूब प्रकरण बद्दल काही माहित नाही, याकूब मेमनचा मृतदेह न्यायालयाच्या निर्णयाने परिवारा दिला गेला होता, असं देखील त्यांनी सांगितले Yakub Memon grave beautification case आहे.



राहुल गांधींना टोला केरळ मध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, माझ्या वडिलांचा जीव द्वेशाच्या राजकारणामुळे गेला. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. काँग्रेस आता भारत जोडो म्हणत असली, तरी त्यांचं धोरण भारत तोडो आहे. शिखांचा तिरस्कार कुणी केला होता? हजारो शिखांना मारण्यात आले होते. आता केरळमध्ये जाऊन तुम्ही सांगता द्वेशाचं राजकारण करु नका. आता सत्ता दूर जात आहे, तेव्हा आता भारत जोडो आठवत आहे.



बारामती म्हणजे महाराष्ट्र नाही सुप्रिया ताईंचा सरकार आता गेलं आहे. त्यांच्या सरकारमध्ये एवढे मुख्यमंत्री होते की, मोजता ही येणार नाही. यांच्या राजकारणात फक्त बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास असा आहे. यांच्या परिवाराचा विकास म्हणजे राज्याचा विकास नाही. यांना राजकीय अल्झायमर झाला असेल. जनता विसरत नाही, पब्लिक है, यह सब जानती है.


म्हणून गडचिरोलीचे हत्ती गुजरातला गेले मागच्या सरकार मध्ये हत्ती हलवण्याचा निर्णय झाला. तेव्हा हत्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गडचिरोलीला डॉक्टर नव्हते. त्यामुळे जामनगर मध्ये फक्त गडचिरोलीतून नव्हे तर कर्नाटकमधील हत्ती ही हलवले होते. आता 5 तारखेला आम्ही निर्णय घेतला आहे की, यापुढे गडचिरोली मधून कोणतेही हत्ती हलवले जाणार नाही. तिथेच विशेष पार्क बनवून त्यांची निगा ठेवली जाईल, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.The DCM Devendra Fadnavis ordered inquiry in Yakub Memon grave beautification case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.