तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण गरजेचे - सरसंघचालक मोहन भागवत

author img

By

Published : Oct 15, 2021, 9:07 AM IST

Updated : Oct 15, 2021, 1:30 PM IST

सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत ()

देशात विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातही दसरा सण साजरा करण्यात आला. 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. दरवर्षी या दिवशी संघ दसरा सण साजरा करण्यात येतो. यावर्षीचा संघाचा हा 96 वा स्थापना दिवस होता.

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग येथील संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात संपन्न झाला. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर आपले परखड मत मांडले. तर काही विषयांवर चिंता देखील व्यक्त केली आहे. आज देशात अराजकता माजवण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत. देशाची एकता आणि अखंडतेवर सुनियोजित पद्धतीने आक्रमण करण्यात येत आहे असे सांगतानाच शत्रूने उगारलेला हात रोखण्याचे बळ हिंदू समाजात यायलाच हवे असे प्रतिपादन त्यांनी केले.

तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण गरजेचे

शत्रूने उगारलेला हात रोखण्याचे बळ हिंदू समाजात हवे असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात केले आहे. देशात तंत्रज्ञानाचा होत असलेला अतिरेक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा बेजा वापर या कडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला,ते म्हणाले कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांकडे मोबाईल आला आहे, मात्र त्या मोबाईलचा वापर कशासाठी केला जातोय या कडे कुणाचेही लक्ष नसल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी असल्याच्या घटना वाढत आहे,यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गमावलेले स्वातंत्र्य आणि अखंडता परत मिळवण्यासाठी, गमावलेल्यांना परत मिळवण्यासाठी देशात भेदरहीत व समताधिष्ठित समाज आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहे.

पथसंचलन
पथसंचलन

व्यवस्थेसोबत मन बदलणे आवश्यक -

जातीगत विषमता मोडून काढण्यासाठी व्यवस्थेसोबत मन बदलणे आवश्यक आहे. कारण भेदाभेद मनात उत्पन्न होतात. त्यातून ती उक्ती, कृती विचारात प्रकट होते. संवाद सकारात्मक व्हावा म्हणून संघ सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून काम करीत आहे. जातीगत विषमता मनातून जाण्यासाठी अनोपचारिक संवाद हवा. यासाठी सणवार, जयंती, पुण्यतिथी मिळून काम केले पाहिजे असं मत सरसंघचालक मोहन भगवान यांनी व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थिती लावली
कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थिती लावली

भारत सर्वांची मातृभूमी -

आपला देश भारत हीच सर्वांची मातृभूमी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांना एकत्र राहावे लागेल. त्यासाठी आपली लहान संकुचित मनोवृत्ती सोडावी लागेल. आपले लहान लहान अहंकार विसरून सर्वांनी एकत्रित यायला हवे असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. हिंदूंनी शक्तीसंपन्न व्हायला पाहिजे. कारण आम्ही कमकुवत आहाे. जागरूक, संघटित, बलसंपन्न व सक्रिय हिंदू समाजच सर्व समस्यांचे समाधान आहे. आपले भेद विसरून संघटित होणे गरजेचे आहे. इस्लाम आक्रमकांच्या नात्याने आला. देशाप्रति बलिदान दिलेल्या मुस्लिमांचे आमचे नाते आहे. इतिहासाच्या घटनांचे व्देष वाढावा यासाठी स्मरण न करता वैर संपावे यासाठी प्रयत्न हवे. समाजाचे सामुहिक हित जोपासण्यासाठी हिंदूंनी सामुहिकरित्या प्रयत्न केले पाहिजे असे भागवत म्हणाले.

शस्त्रपूजन
शस्त्रपूजन

विभाजनाचे दुःख आजही सलते -

कायदा मोडणारा आणि देश विरोधात जाणाऱ्यांना रोखण्यासाठी आपल्याला संघटित होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. स्वातंत्र्यासोबत देशाचे विभाजन झाले. त्या वेदनेचे दुःख अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

Last Updated :Oct 15, 2021, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.