ETV Bharat / city

ST Worker Suspension : आज २७० एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; एकूण आकडा साडेसहा हजाराच्यावर

author img

By

Published : Jan 28, 2022, 9:52 PM IST

ST Strike
ST Strike

एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ( MSTCR Take Action Against Worker ) कारवाईच सत्र सुरु केले आहे. आज महामंडळाने ( MSTCR Suspend ST Worker ) २७० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ४२६ वर पोहचली आहे.

मुंबई - गेल्या तीन महिन्यापासून संपावर ( ST Worker Strike ) ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ( MSRTC Take Action Against Worker ) कारवाईच सत्र सुरु केले आहे. आज महामंडळाने ( MSRTC Suspend ST Worker ) २७० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ४२६ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ७ हजार ८७६ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहे.

११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करू सुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही आहे. या संपावर तोडगा निघावा, यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन केले. मात्र, तरी सुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची कारवाई जोरदार सुरु आहे. आज २७० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ६ हजार ४२६ झाली आहे. आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार ८७६ झाली आहे.

६२ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात -

सध्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त २७ हजार १२१ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. उर्वरित ६२ हजार ८७९ कर्मचारी आता पण संपात सहभागी आहेत. त्यामुळे एसटीचे कोट्यवधी रूपयांचा चुरडा होत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

२५० आगारांपैकी २४४ सुरु -

विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून संपावर गेले आहेत. यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक पूर्णपणे काेलमडली आहे. ग्रामीण भागातील जनतेची गैरसाेय राेखण्यासाठी महामंडळाने मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून ८०० कंत्राटी चालकांना घेतले आहे. त्यानंतर महामंडळातील यांत्रिकी कर्मचारी, सहाय्यक वाहतूक निरिक्षकांना चालक, तर वाहतूक नियंत्रकांना वाहकाचे काम देण्यात येणार आहे. याशिवाय आज २७ हजार १२१ एसटी कर्मचारी कामावर हजर होते. त्यामुळे बंद पडलेल्या आगार पुन्हा सुरु होत आहे. आज २५० आगारांपैकी २४४ आगार सुरु झाले असून ६ आगार अद्यापही बंद आहेत.

हेही वाचा - Sambhaji Bhide on Wine Salling Decision : राज्यपालांनी 'हे' सरकार बरखास्त केले पाहिजे; वाईन विक्रीच्या निर्णयावर संभाजी भिडे भडकले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.