ETV Bharat / city

Initiative of Bal Gopal Mitra Mandal of Mumbai टाकाऊतून टिकाऊ गणपती, केळीच्या खांबापासून बनवला गणपती, मुंबईच्या बालगोपाळ मित्रमंडळाचा उपक्रम

author img

By

Published : Aug 28, 2022, 1:26 PM IST

मुंबई विलेपार्ले येथील Bal Gopal Mitra Mandal of Mumbai बाल गणेश मित्रमंडळ यांनी Bal Ganesha Mitramandal in Vileparle चक्क केळीच्या खांबापासून गणपती Ganesha Made From Banana Poles बनवलेला Sustainable Ganesha From Waste आहे. कशा रीतीने केळीच्या खांबापासून गणपतीची मूर्ती Bal Ganesha Mandal Made Ganesha From Banana Pole साकारली जाणून घेऊया यावरील खास रिपोर्ट

Initiative of Bal Gopal Mitra Mandal of Mumbai
मुंबईच्या बालगोपाळ मित्रमंडळाचा उपक्रम

मुंबई गणपती उत्सव दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा बहरतोय. जनतेने अत्यंत उत्साहाने आनंदाने गणपतीच्या उत्सवासाठी तयारी केली. विविध ठिकाणी गणपतीची मोठी मूर्ती आकर्षक मूर्ती आपल्याला जागोजागी Ganesha Made From Banana Poles दिसते. मात्र, मुंबईतील बालगोपाळ मित्रमंडळ या गणेश मंडळाने Balgopal Mitramandal Ganesh Mandal in Mumbai आगळीवेगळी मूर्ती साकारली Balgopal Mandal Created Different Idol आहे. जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत.

मुंबईच्या बालगोपाळ मित्रमंडळाचा उपक्रम


श्रीगणेशाचे आगमन म्हणजे चैतन्याची सुरुवात गणपती उत्सव आला की, उत्सवासाठी दोन महिने, तीन महिने आधी मंडळाचे कार्यकर्ते विविध तयारीला लागतात. वर्गणी, मंडप मूर्ती त्या अनुषंगाने संपूर्ण दहा दिवस आणि त्याची तयारी अत्यंत चैतन्यमय असते. बाजारामध्ये गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या तसेच सजावटीसाठी प्लास्टिकच्या, पुठ्ठ्याच्या, थर्माकोलच्या वस्तूदेखील दिसतात. विद्युत रोषणाईसाठी इलेक्ट्रिकच्या माळा अशा इत्यादी अनेक वस्तूंची रेलचेल असते. मात्र, विलेपार्ले येथील बाल गणेश मित्रमंडळ यांनी Bal Ganesha Mitramandal in Vileparle चक्क केळीच्या खांबापासून गणपती बनवलेला आहे. कशा रीतीने केळीच्या खांबापासून गणपतीची मूर्ती Bal Ganesha Mandal Made Ganesha From Banana Pole साकारली जाणून घेऊया यावरील खास रिपोर्ट


टाकाऊतून टिकाऊ, गणपती केळीच्या खांबापासून बनवला गणपती आपल्याकडे लग्नाच्या वेळी किंवा अनेक जण धार्मिक किंवा आपापल्या जातीचे सण, आरत्या पूजा करीत असतात. त्यावेळी केळीचे खांब प्रवेशद्वारावर लावण्याची परंपरा आहे. लग्न सोहळा किवा कार्यक्रम उरकला की केळीचे खांब कचराकुंडीत फेकले जातात. मात्र, या बाल गणेश मित्रमंडळाने याचा अनोखा वापर केला आहे. मूर्तिकार राजेश दिगंबर मयेकर यांनी पर्यावरणपूरक आणि अत्यंत नावीन्यपूर्ण अशा केळीच्या खांबापासून मूर्ती बनवलेली आहे. यासाठी आठ ते नऊ महिने कालावधी लागतो, असे मूर्तिकार राजेश दिगंबर मयेकर यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.


केळीच्या खांबापासून गणपती याची प्रक्रिया पुढे ते नमूद करतात की, केळीचे खांब आठ महिने आधीच गोळा करून त्याला स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये त्याचा सगळा चुरा केला जातो. टिश्श्यू पेपर कागदाचा लगदा केला जातो. कागद आणि केळीचे खांब यांचे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक केले जाते. मग ते उन्हात वाळवून सुकवले जाते. त्यानंतर संपूर्ण मिश्रण हे डिंक आणि इतर चिकटवण्याचे साहित्य वापरून एका साच्यात घातले जाते आणि मूर्तिकार आपल्या परीने ती मूर्ती साकारतो. ही प्रक्रिया जवळजवळ आठ ते नऊ महिने चालते. असे बाल गणेश मित्र मंडळाचे सचिव मयुरेश परमार यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले. यामुळे पर्यावरणाला हानी होत नाही. याचे संपूर्ण विघटन होते. त्याच्यामुळे या नावीन्यपूर्ण गणपतीची उत्सुकता त्या परिसरामध्ये ताणली गेली होती. आता प्रत्यक्ष गणपती स्थानापन्न होणार आहे.

हे मंडळ दरवर्षी नवीन संदेश घेऊन गणपती साजरा करतो पाण्यात आपण जी तुरटी घालतो, जेणेकरून पाणी स्वच्छ होते. त्या तुरटीपासून मागच्या वर्षीदेखील गणपती तयार केला होता. ह्या बाल गणेश मंडळाची खासियत आहे की दरवर्षी काही तरी संदेश घेऊन ते मूर्तीबाबत विचार करतात. त्यासाठी सहा महिने आधी तयारी करतात. गणपती उत्सव झाला की लागलीच बैठक घेऊन पुढील वर्षी काय कल्पना साकारणार याची चर्चा मंडळात होते. विषय ठरला की प्रत्येकजण जबाबदारीनुसार कामाला लागतो. पर्यावरण जपले पाहिजे. प्रचंड प्रदूषण वाढत आहे. हे सर्व पाहता आम्ही आमच्या परीने छोटासा प्रयत्न करीत असतो, असे मयूरेश परमार यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.

हेही वाचा Devappa Jamdar Officiating at Crematorium स्मशानात 40 वर्षांहून अधिक काळ सेवा देण्याचे काम करणारे 80 वर्षीय देवाप्पा जमादार, आता देणार ऑनलाईन सेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.