ETV Bharat / city

राज्यातील कोरोना बाधितांची मृत्यूसंख्या वाढली: रुग्ण आढळल्याने औरंगाबाद, नाशिकमधील काही शाळा बंद

author img

By

Published : Jul 31, 2021, 5:55 PM IST

Corona News
संपादित छायाचित्र

शुक्रवारी राज्यात ७, २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी त्यात घट होऊन ६,६०० रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १९० मृत्यू झाले होते, त्यात वाढ होऊन शुक्रवारी २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना बाधित आढळून आल्याने 5 शाळा बंद करण्यात आल्या. औरंगाबादेतही कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील 30 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

मुंबई - राज्यात या महिन्यात १, ६ आणि १८ जुलैला कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलैला या महिन्यातील सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी ७, २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी त्यात घट होऊन ६,६०० रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १९० मृत्यू झाले होते, त्यात वाढ होऊन शुक्रवारी २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसह शिक्षकही कोरोना बाधित आढळल्यामुळे औरंगाबादेतील 30 तर नाशिक जिल्ह्यातील 5 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील ७, ४३१ रुग्णांना शुक्रवारी डिस्चार्ज

राज्यात शुक्रवारी ७,४३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. शुक्रवारी राज्यात ६,६०० नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३२,५६६ मृत्यूची नोंद राज्यात झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७७,६०,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९६,७५६ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७९,५५३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७७,४९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जुलै महिन्यात वाढली मृत्यू संख्या

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यातील या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ३२२

रायगड - १८५

अहमदनगर - ८२४

पुणे - ६७५

पुणे पालिका - २४७

पिपरी चिंचवड पालिका - १५६

सोलापूर - ५१९

सातारा - ८३०

कोल्हापूर - ५१९

कोल्हापूर पालिका - १६०

सांगली - ६३७

सिंधुदुर्ग - १७४

रत्नागिरी - २१५

बीड - १८५

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या

30 जुलै - 6600 नवे रुग्ण

29 जुलै - 7242 नवे रुग्ण

28 जुलै - 6857 नवे रुग्ण

27 जुलै - 6258 नवे रुग्ण

26 जुलै - 4877 नवे रुग्ण

25 जुलै - 6843 नवे रुग्ण

24 जुलै - 6269 नवे रुग्ण

23 जुलै - 6753 नवे रुग्ण

22 जुलै - 6753 नवे रुग्ण

22 जुलै - 7302 नवे रुग्ण

21 जुलै - 8159 नवे रुग्ण

20 जुलै - 6910 नवे रुग्ण

19 जुलै - 6017 नवे रुग्ण

18 जुलै - 9000 नवे रुग्ण

17 जुलै - 8172 नवे रुग्ण

16 जुलै - 7761 नवे रुग्ण

15 जुलै - 8010 नवे रुग्ण

14 जुलै - 8602 नवे रुग्ण

13 जुलै - 7243 नवे रुग्ण

12 जुलै - 7603 नवे रुग्ण

11 जुलै - 8535 नवे रुग्ण

10 जुलै - 8296 नवे रुग्ण

9 जुलै - 8992 नवे रुग्ण

7 जुलै - 9558 नवे रुग्ण

5 जुलै - 6740 नवे रुग्ण

4 जुलै - 9336 नवे रुग्ण

3 जुलै - 9489 नवे रुग्ण

2 जुलै - 8753 नवे रुग्ण

1 जुलै - 9195 नवे रुग्ण

रुग्ण आढळून आल्याने औरंगाबादेतील 30 शाळा बंद

ग्रामीण भागात शाळा सुरू करत असताना ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले. कोविडमुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या असल्या, तरी कोरोना रुग्ण आढळून येताच शाळा बंद करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मागील पंधरा दिवसांमध्ये 30 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोविड रुग्ण बरे झाल्यावर महिनाभरात पुन्हा शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली आहे.

'या' तालुक्यातील शाळा करण्यात आल्या बंद

औरंगाबाद तालुका - 92 पैकी 1,

कन्नड - 72 पैकी 2,

गंगापूर - 84 पैकी 7,

पैठण - 61 पैकी 5,

फुलंब्री - 58 पैकी 1,

वैजापूर - 51 पैकी 12,

सिल्लोड - 120 पैकी 2

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील गाव कोरोनामुक्त होताच, शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी

ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात आल्या असल्या, तरी शहरी भागात अद्याप शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. शहरासह ग्रामीण भागातील पालकांनी पूर्ण शाळा सुरू करा अशी मागणी केली आहे. मात्र शासन निर्णयानुसार अद्याप शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. शिक्षण समितीने ठराव घेऊन शासनाला प्रस्ताव पाठवून पाचवीच्या वरील वर्ग सुरू करावे, असा प्रस्ताव असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नाशिकमधील 5 शाळा बंद

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या 277 शाळांपैकी पाच शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. 3 विद्यार्थी, 3 शिक्षकेत्तर कर्मचारी आणि 2 शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सिन्नर, निफाड, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या शाळा बंद करण्यात आल्याल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली आहे.

शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. मागील महिनाभरात जेथे एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, अशा गावांमध्येच शाळा सुरु करण्याची अट होती. त्यानुसार जिल्ह्यातील 850 पैकी 335 शाळा सुरु करण्याबाबत अहवाल प्राप्त झाले. यापैकी 277 शाळा सुरुही झाल्या. पण सुरु झालेल्या शाळांपैकी सिन्नर, निफाड, देवळा आणि मालेगाव या चार तालुक्यांतील पाच शाळांमध्ये 8 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये थेट विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीच बाधित निघाल्याने या शाळा बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.