ETV Bharat / city

Monsoon Session 2022 शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याची सूत्राची माहिती

author img

By

Published : Aug 17, 2022, 7:45 AM IST

Monsoon Session 2022
मान्सून अधिवेशन २०२२

गेल्या ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना हायसे वाटले होते. Monsoon Session of Shinde Govt परंतु खातेवाटप न झाल्यामुळे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविल्या होत्या. त्यामध्ये सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याचे समजते.

मुंबई राज्याचे २०२२ चे पावसाळी अधिवेशन 2022 Monsoon Session आजसून विधान भवन Vidhan Bhavan Mumbai मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन असताना विरोधकांच्या प्रश्नांना कसे सामोरे जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांनी आपल्या लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न संबंधित विभागांना पाठवले होते. पण मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी या फाईल आपापल्या विभागातच ठेवल्या होत्या. गेल्या ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना हायसे वाटले होते. Monsoon Session of Shinde Govt परंतु खातेवाटप न झाल्यामुळे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविल्या होत्या. त्यामध्ये सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याचे समजते.

अधिवेशनापूर्वी पंधरा दिवस काम अपेक्षित अधिवेशन सुरु होण्याच्या १५ ते २० दिवस अगोदर आमदारांमार्फत संबंधित विभागांकडे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न येत असतात संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी लेखी उत्तरे दिल्यानंतर ती विधानमंडळ कार्यालयाकडे पाठवली जातात तेथे शुद्धलेखन आणि राजशिष्टाचार तपासणी करून शासकीय मुद्रणालयाकडे छपाईसाठी पाठवली जातात. त्यानंतर उत्तरांच्या छापील पुस्तकांचे सर्व आमदारांना वितरण केले जाते परंतु अद्याप एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे बैठका आणि लोकांच्या कामांना त्यांनी थेट प्राधान्य दिल्यामुळे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांवर उत्तरे देण्यास त्यांना वेळ मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.

प्रश्नांच्या उत्तरासाठी सुट्ट्यांचा अडसर अधिवेशन बुधवारी १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पण १३ ते १६ ऑगस्टपर्यंत विविध सार्वजनिक सुट्ट्यांमुळे मंत्रालय बंद राहिले आहे. रविवारी खातेवाटप झाल्यामुळे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर येऊन पडली असली तरी मंत्र्यांना समजून सांगण्याऐवढा वेळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे नाही मुख्यमंत्री हेच सर्वस्वी सर्वच खात्यांना जबाबदार असल्यामुळे आमदारांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याची वेळ शिंदे यांच्यावर येऊ शकते असा अंदाजही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवला आहे.

पावसाळी अधिवेशवन तात्पुरते दिनदर्शिकेवर दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून, यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुटी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यावर त्वरित ही मदत देणे सुरु होईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी केली आहे. दुसरीकडे विरोधक सरकार विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.