ETV Bharat / city

समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढला म्हणजे त्यांची चूक आहे असं नाही - प्रवीण दरेकर

author img

By

Published : Nov 6, 2021, 9:04 AM IST

PRAVIN DAREKAR
प्रवीण दरेकर

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. समीर वानखेडे यांच्यावर केवल बिनबुडाचे आरोप झाले म्हणून तपास काढला असेल तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटलं.

मुंबई - क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खान सह पाच प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार असल्याने आता वादाला नवीन तोंड फुटले आहे. आर्यन खान बरोबर अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याचा तपास सुद्धा आता दिल्ली एनसीबी करणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. समीर वानखेडे यांच्यावर केवळ बिनबुडाचे आरोप झाले म्हणून तपास काढला असेल तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटलं. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढला म्हणजे त्यांची चूक आहे असं नाही, असेही ते म्हणाले.

समीर वानखेडे यांच्या बदलीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
काय म्हणाले प्रवीण दरेकर -समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घ्यायचा किंवा त्यांची बदली करायची हा तपास यंत्रणेचा भाग आहे. केवल नवाब मलिक यांनी आरोप केले. म्हणून त्यांची बदली करून किंवा त्यांच्याकडून तपास काढून घेतला जात आहे, असं काही नाही आहे. तपास चुकीचा केला म्हणून त्यांना हटवलं किंवा तपास प्रभावित होईल म्हणून त्यांना बदलण्यात येत आहे ,असं काही म्हणण्याची गरज नाही, असे दरेकर म्हणाले.समीर वानखेडे कर्तबगार अधिकारी -जेव्हा एखादा कर्तबगार अधिकारी अशा पद्धतीचे काम करतो. तो तपास करण्यामध्ये सक्षम असताना जाणीवपूर्वक त्यांची बदली केली जात असेल. त्याच्याकडून तपास काढून घेतला जात असेल तर ते अन्यायकारक होईल. दुसरे अधिकारी जरी आले तरी तपास तिथे सखोलच होणार आणि यामध्ये निश्चित काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये समजेल. मग या प्रकरणात बिनबुडाचे आरोप सातत्याने होत असताना एवढ्या मोठ्या एनसीबीच्या तपास यंत्रणेबाबत लोकांच्या मनात साशंकता नसावी म्हणून ह्याचा निष्पक्षपातीपणे व्हावा या भावनेतून हा तपास दुसरीकडे दिला गेला असेल आणि याची तपशीलवार माहिती टप्प्याटप्प्याने होणाऱ्या घडामोडी वरून समजून येईल, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता -

नवाब मलिक यांनी म्हटले की, समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आले आहे. एकूण 26 प्रकरणे असून त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मलिक यांनी म्हटले. ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले.

आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.