aryan drug case : ड्रग तस्कर विजय प्रसादला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बिहारला रवाना

author img

By

Published : Oct 18, 2021, 9:38 PM IST

Crime Branch

आर्यन खान ड्रग प्रकरणाच्या तपासाचा अवाका वाढला असून, आता या प्रकरणात बिहारच्या मोतिहारी मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेला ड्रग तस्कर विजय वंशी प्रसाद याचे नाव समोर आले आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक सेलचे एक पथक बिहारला रवाना झाले आहे.

मुंबई - आर्यन खान ड्रग प्रकरणाच्या तपासाचा अवाका वाढला असून, आता या प्रकरणात बिहारच्या मोतिहारी मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेला ड्रग तस्कर विजय वंशी प्रसाद याचे नाव समोर आले आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक सेलचे एक पथक बिहारला रवाना झाले आहे.

हेही वाचा - सर्व आरोपींप्रमाणेच आर्यन खानचेही समुपदेशन - समीर वानखेडे

..अशी झाली होती विजय वंशी प्रसादला अटक

चौकशीसाठी चार दिवसांपूर्वीच न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. चौकशीत विजय वंशी प्रसादच्या ड्रग सप्लाईच्या नेपाल नेटवर्कबाबतही एनसीबीला माहिती मिळाली होती. 19 सप्टेंबरला मुजफ्फरपूरमध्ये नेपालच्या 3 ड्रग पुरवठादारांसह एकूण 6 लोकांना अटक झाली होती. सोबतच 1 किलो चरस आणि 13 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले होते. या पुरवठादारांच्या सांगण्यावरूनच पूर्व चंपारणच्या चकिया टोल प्लाजा जवळून मुंबईचा तस्कर विजय वंशी प्रसाद, उस्मान शेखसह 7 व्यक्तींना अटक झाली होती.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींनी केले महत्वाचे खुलासे

आर्यन खानसह ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींनी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. ड्रग पुरवठ्याचे जाळे आता नेपाळ आणि उत्तर बिहारमधील मुजफ्फरपूरच्या अनेक तस्करांशी जुळत आहेत. सुत्रांकडून मिळाेल्या माहितीनुसार, सेंट्रल जेलमध्ये कैद नेपाळचे तीन आणि मुजफ्फरपूर कटरा पहसौलच्या तीन तस्करांची माहिती देखील पोलिसांकडून घेण्यात आली आहे.

..अशी व्हायची ड्रगची तस्करी

महाराष्ट्रातील मलाड वेस्ट येथील दीपक यादव उर्फ टार्झन उर्फ बाबा या सिंडिकेटचा सुत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. दीपकसाठीच उस्मान, विजय, नेपाळ येथील प्रकाश, सात्विक, संजय आणि मुजफ्फरपूरच्या कटरा पहसौलचा गौरव कुमार, बांसो कुमार आणि रुपेश शर्मा काम करत होते. हे सर्व कारने नेपाळहून रस्तामार्गे महाराष्ट्रात ड्रगची तस्करी करत असे.

अमली पदार्थ देशासाठी समस्या

अमली पदार्थ देशासाठी मोठे संकट बनले आहे. आर्थिक गुन्हे युनिट जे अंमली पदार्थांसाठी नोडल एजन्सी देखील आहे, त्याचबरोबर एनसीबी आणि एसएसबीकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. तस्करीच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये अमली पदार्थ पोहोचवली जात आहेत. अनेक तस्करांना एनसीबी, एसएसबी आणि आर्थिक गुन्हे युनिटने अटकही केली. तस्कर बिहार आणि झारखंडचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी मार्ग म्हणून वापर करत राहिले आहेत. काही लोकांनी अमली पदार्थांच्या तस्करीला जगण्याचे साधन बनवले आहे.

एनसीबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2020 मध्ये एनसीबीद्वारे 6 हजार 25 किलो गांजा, 2.45 किलो हेरॉइन, 3.90 किलो चरस आणि 51.40 किलो अफू जप्त करण्यात आला होता. या व्यतिरिक्त पूर्ण वर्षभरात 85 तस्करांना अटक करण्यात आली होती. तेच वर्ष 2021 मध्ये एनसीबीच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 30 लोकांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - जगण्याची अशीही जिद्द; दिव्यांग विक्रेत्याकडून मुंबईतील रस्त्यांवर दिवाळीतील कंदीलांची विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.