ETV Bharat / city

BMC Action Against Plastic Bags Shopkeepers: मुंबई मनपा अ‍ॅक्शन मोडमध्ये! "ही" चुक करणाऱ्यांवर कारवाई होणार

author img

By

Published : Aug 2, 2022, 8:44 PM IST

Updated : Aug 2, 2022, 9:11 PM IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने जून २०१८ मध्ये प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने मार्च २०२० पर्यंत प्लास्टिक विरोधात कारवाई केली. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने ही कारवाई बंद करण्यात आली होती. आता पालिकेने पुन्हा कारवाई कडक केली आहे. ( BMC Action Against Plastic Bags Shopkeepers ) ज्या दुकानदारांकडून आणि फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यांच्याकडील प्लास्टिक जप्त करून, दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

प्लास्टिकची पिशवी वापरणाऱ्या दुकानदारांवर मनपाची कारवाई
प्लास्टिकची पिशवी वापरणाऱ्या दुकानदारांवर मनपाची कारवाई

मुंबई - मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी जलप्रलय आला होता. यावेळी प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे नाल्यातील पाण्याचा निचरा झाला नसल्याचे समोर आले होते. यासाठी राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ( Mumbai BMC ) जून २०१८ मध्ये राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. महानगरपालिकेच्या लायसन्स विभागाकडून जून २०१८ ते मार्च २०२० पर्यंत प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यात आली.

६७० किलोवर प्लास्टिक जप्त - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्याने ही कारवाई बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिक विरोधी कारवी तीव्र करण्यात आली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. १ जुलै ते ३१ जुलै या महिनाभरात १८ हजारापेक्षा अधिक ठिकाणी भेटी देऊन केलेल्या तपासणीत तब्बल ६७० किलोवर प्लास्टिक जप्त केले. या धडक कारवाईत १७७ जणांकडून ८ लाख ८० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

या प्लास्टिकवर बंदी - ५० मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणार्‍या पिशव्या ( हँडल असलेल्या व नसलेल्या) प्लॅस्टिकपासून बनवण्यात येणार्‍या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणार्‍या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश आहे.

अशी केली जातेय कारवाई - उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये प्रथम गुन्‍ह्यासाठी ५,००० रुपये, दुसऱ्या गुन्‍ह्यासाठी १०,००० रुपये आणि त्यानंतरच्या गुन्‍ह्यासाठी ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५,००० रुपये पर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. संबंधितांनी कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

हेही वाचा - Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दुचाकीची न्यायालयाकडून पाहणी

Last Updated :Aug 2, 2022, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.