ETV Bharat / city

Political Leader Religiouse Statements : राजकीय नेत्यांच्या धार्मिक वक्तव्यामुळे राज्यात अशांतता निर्माण होते का?

author img

By

Published : Apr 18, 2022, 4:25 PM IST

loudspeaker
loudspeaker

मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. तर, राज्यात धार्मिक वक्तव्य करून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले ( Political Leaders Religiouse Statements ) आहे.

मुंबई - भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी राज्य सरकारला 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. तर राज्यातली कायदा व सुव्यवस्था यामुळे बिघडू नये. यासाठी राज्य सरकार हरकतीत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( HM Dilip walase Patil ) याबाबतची बैठक घेतली. राज्यात धार्मिक वक्तव्य करून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले ( Political Leaders Religiouse Statements ) आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या धार्मिक वक्तव्यामुळे राज्यामध्ये तणाव निर्माण झाला, आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही. मशिदीवरील भोंगे लावण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. तर तिथे जेम्स लेन ( James Lane ) यांनी आपल्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत ( Chhatrapati Shivaji Maharaj ) आक्षेपार्ह लिखाण केलं असल्याचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेला जातोय. तर तेथेच राजकीय नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापलेल्या पाहायला मिळतेय. यासोबतच "छेडेंगे तो छोडेंगे नही" अशी प्रक्षोभक वक्तव्य देखील काही लोकांकडून केली जात आहेत. त्यामुळे एकूणच या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रावर प्रभाव पडत असून, राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मशिदीवरील लाऊड स्पीकर समोर हनुमान चालीसाचा भोंगा - राज ठाकरे यांनी 2 एप्रिलला घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान आपल्या भाषणातून अजानसाठी मशिदीवर लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता. कायद्यानुसार लाऊड स्पीकर लावण्याला मनाई असताना देखील मशिदीवर लाऊड स्पीकर कसे लावले जातात. त्यावर अजान केली जाते. त्यामुळे बेकायदेशीर मशिदीवर लावण्यात आलेले लाऊडस्पीकर काढण्यात यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केली. तसेच, ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला तीन मेपर्यंत बेकायदेशीरपणे मशिदीवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. लाऊड स्पीकर न काढल्यास हनुमान चालीसा लावण्याचा आदेश त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील मेळाव्याच्या भाषणानंतर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकर वर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला. दादर मध्ये तर थेट शिवसेना भवनाच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली होती. बेकायदेशीर लाऊड स्पीकरचा वापर केल्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

हनुमान जयंतीचा अभूतपूर्व जल्लोष - 16 एप्रिलला हनुमान जयंती राज्यभरातच नाही तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, यावेळी महाराष्ट्रात हनुमान जयंतीच्या उत्सवाला राजकीय झालर पाहायला मिळाली. राज ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी थेट बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन महाआरती करत हनुमान जयंती साजरी केली. दरवर्षी हनुमान जयंती उत्सवात साजरी होते. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय चढाओढीत यावर्षीच्या हनुमान जयंतीला वेगळे वलय प्राप्त झाले होते. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांकडून हनुमान जयंती उत्सवात साजरी करत असताना एकमेकांना राजकीय उपदेश देण्याचे प्रयत्न झालेले पाहायला मिळाले.

नाना पटोले आणि दिलीप वळसे पाटील माहिती देताना
जेम्स लेनचे वादग्रस्त लिखाण? - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाषणात घेत नाहीत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी ( Raj Thackeray Criticized Sharad Pawar ) केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Babasaheb Purandare ) यांच्या बाबत देखील शरद पवार यांना आकस असल्याचे आपल्या भाषणातून राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, लेखक जेम्स लेन ( James Lane ) यांनी लिहिलेले 'शिवाजी- हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते. याबाबतची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनला दिली असल्याचा आरोप पुन्हा एकदा शरद पवारांनी केला आहे. तसेच, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पुरंदरेंनी केलेल्या लिखाणाबाबत ट्विट करत महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही, असा उल्लेख केला आहे. पण, 2010 साली जेम्स लेनच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. त्यावेळी या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकारण तापले होते. मात्र, आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकारण तापताना दिसणार आहे.अयोध्या दौऱ्या मागचे राजकारण - आदित्य ठाकरेंनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौरा निश्चित केला आहे. भाजपाकडून सातत्याने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्याची आठवण करून दिली जाते. शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली असल्याची टीका सातत्याने भाजपाकडून केली जाते. त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. तर तिथेच राज ठाकरे हे देखील 5 जूनला अयोध्येला जाणार असून त्यांच्याकडून ही हिंदुत्वाच्या मुद्द्याचा पुरस्कार केला जाणार आहे. मात्र, या दोन्ही पक्षाकडून केल्या जाणाऱ्या आयोध्या दौऱ्याचे पुढील काळात राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था बाबात गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक - भाजपा आणि मनसेकडून केल्या जाणऱ्या धार्मिक वक्तव्यांना महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात येणाऱ्या उत्तरामुळे सध्या राज्यात वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेल्या तीन मे च्या अल्टीमेटम मुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री वळसे पाटलांसोबत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीतून सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकर बाबत परवानगी आणि कायदेशीर कारवाई बाबत चर्चा करण्यात आली. तसेच, राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. याबाबत राज्य सरकार सतर्क झाले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी - देशात बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा महत्त्वाचा असून, त्या मुद्द्यापासून लोकांना दूर नेण्यासाठी धार्मिक मुद्दा समोर आणला जात आहे. जाणूनबुजून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातले धार्मिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. या समस्येवर समाधान काढण्यासाठी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी एकत्र बसून याबाबत मार्ग काढणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातले वातावरण बिघडतय - मनसे आणि भाजपाकडून लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. मशिदीवरचे लाऊड स्पीकर, हनुमान चालीसा याचा वापर करून भावनात्मक पद्धतीने लोकांना चिथावणी देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल का? अशी परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो, अशी शंका राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केली आहे. वातावरण चिघळून गोंधळ निर्माण करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करायची, असे दुहेरी संकट राज्यावर आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचे मतही प्रवीण यांनी व्यक्त केले आहे. "छेडेंगे तो छोडेंगे नही" - राज ठाकरे यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवले गेले नाही, तर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मुंब्रा येथील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर पोलीस आता इशारा देणाऱ्या संघटनेचे नेते मतीन शेख आहे यांचा शोध घेत आहेत. सध्या मतीन शेख आणि हे फरार आहेत. मात्र, त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्य आहे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

हेही वाचा - Exclusive : कायद्यानुसार सरकारने राज्य चालवावे.. भोग्यांवर गोपीचंद पडळकर यांची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.