ETV Bharat / city

Lalbaugcha Raja 2022: इच्छापूर्ती करणारा मुंबईचा लालबागचा राजा

author img

By

Published : Sep 3, 2022, 8:11 PM IST

Updated : Sep 4, 2022, 3:21 PM IST

Lalbaugcha Raja
लालबागचा राजा

मुंबईतील (Ganesh Utsav in Mumbai) प्रसिद्ध मंडळापैकी एक असलेल्या लालबागचा (Lalbagcha Raja Mandal) राजाचे (Lalbagcha Raja Ganeshotsav) मुंबईत विशेष महत्त्व आहे. संपूर्ण जगात विख्यात असलेल्या लालबागचा राजा मंडळाचे यंदा 89 वे वर्ष (89th Year of Lalbagcha Raja) आहे. ईच्छापुर्ती करणारा मुंबईचा राजा (The wish fulfilling Raja of Mumbai Lalbaug) अशी गणरायाची विशेष ओळख आहे. जाणुया या राजा विषयी.

मुंबई: लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. सध्या ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात येते तेथे कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती झाली त्यामुळे तेथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रुपात श्रीची स्थापना करण्यात आली होती तेव्हा पासून नवसाला पावणारा लालबागचा राजा (The wish fulfilling Raja of Mumbai Lalbaug) म्हणून मूर्ती प्रसिद्ध झाली.

राजाचा इतिहास : लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती करीता जनजागृती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी समोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे काम हाती घेतले. सन इ.स. १९३४ ते इ.स. १९४७ या स्वातंत्र्यपूर्व काळात याठिकाणी विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. त्यावेळी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस.एम.मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्वनिष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस. के. पाटील, गो. बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत.

मूर्तीचे वैविध्यपूर्ण स्वरूप : त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ सालची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात गणरायाची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले होते असे सांगितले जाते.

मंडळाच्या कार्याचे स्वरूप इ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा बदलण्यात आली. मंडळाने मग राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याला प्राधान्य दिले. मंडळाच्या शिल्लक निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात छोटा वाटा उचलला. नंतर देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर होऊ लागले.

रौप्य महोत्सव साजरा इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म. ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, गोविंदराव महाशब्दे, वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे आदींची व्याख्याने झाली.

वाढता प्रभाव आणि प्रसार इ.स. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. इ.स. १९४८ ते इ.स. १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. यात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करत तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजही चालू आहे. तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पद्धत सुरू केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकनरोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित केले ते पुढे दृढ होत गेले.

मंडळाचे सामाजिक कार्य मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात. ग्रंथालय उपक्रम राबविला जातो.तसेच नेत्र शिबिर,रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखी शिबिरे आयोजित केली आहेत. भारत पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱया भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी `आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा'करिता रु. १ लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचेकडे सुपूर्द केला.

सामाजिक उपक्रम लोकांना एकत्र आणणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व स्तरातून लाखो लोक एकत्र येतात आणि दर्शनाच्या अपेक्षेने सर्व मतभेद बाजूला ठेवतात. त्यांची राजाप्रती असलेली भक्तीच त्यांना वर्षानुवर्षे लालबागकडे खेचत असते. राजा पण वंचितांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आला आहे. गणेशोत्सव मंडळ 1934 पासून अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. देशात कोणतीही आपत्ती आली तरी मंडळाने नेहमीच हातभार लावला आहे. 1947 मध्ये, मंडळाने आपली शिल्लक रक्कम कस्तुरबा फंड आणि 1959 मध्ये बिहार पूर मदत निधीला दान केली. 1959 मध्ये बिहारमधील पूर आणि 1962 आणि 1965 च्या युद्धादरम्यान मंडळाने राष्ट्रीय निधीमध्ये योगदान देऊन आपले योगदान दिले.

विसर्जन लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते.

हेही वाचा Ganeshotsav 2022: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; मुस्लिम बांधवांकडून 25 वर्षांपासून दिली जाते गणपतीची मूर्ती

Last Updated :Sep 4, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.