ETV Bharat / city

Assembly Winter Session : बाप आजारी असताना चर्चा करता का..? मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका करणाऱ्या विरोधकांवर आव्हाडांचा संताप

author img

By

Published : Dec 22, 2021, 10:25 PM IST

Updated : Dec 22, 2021, 10:50 PM IST

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून आज जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील, अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.

jitendra awhad salms bjp
jitendra awhad salms bjp

मुंबई - राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टिकेचे सूर उमटले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर याबाबत संताप व्यक्त केला. कुणाच्या ही आजारपणावर टीका करणे, आपली संस्कृती नाही. आपला बाप आजारी असताना, आपण अशी चर्चा करतो का, असा संतप्त सवाल त्यांनी विरोधकांना यावेळी विचारला. विधानभवना बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
बाप आजारी असताना, विचारतो का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत होते. परंतु, पहिल्या दिवशी हजर राहतील, अशी शक्यता होती. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून आज जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील, अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला. तसेच कोणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी बोलणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.


हे ही वाचा - Assembly Winter Session : प्रथा बदलण्याचा अट्टाहास का.. 170 च्या बहुमतावर सरकारला विश्वास नाही का? फडणवीस यांचा सवाल


..देर आये दुरुस्त आये

शरद पवार यांनी लागू केलेले आरक्षण आता रद्द होण्याची वेळ आली आहे. केंद्राने सांगितले इम्पेरिकल डेटा बरोबर आहे. तोच डेटा नंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर बरोबर नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संभ्रम निर्माण करणारा आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक न्याय, अशी वागणूक देत आहे. परंतु, असो.. देर आये दुरुस्त आये, अशी शेरोशायरी करत आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला.

Last Updated :Dec 22, 2021, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.