ETV Bharat / city

देशात कायद्याचे राज्य आहे का?, की केंद्रातील राज्यकर्त्यांनी नवीन कायदा आणलाय -नवाब मलिक

author img

By

Published : Sep 1, 2021, 10:26 PM IST

देशात कायद्याचे राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई - या देशात कायद्याचे राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

'कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिली नाही'

अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना अचानक दहा-बारा जणांनी त्यांची गाडी अडवून वकील व जावई यांना ताब्यात घेतले आणि सोबत घेऊन गेले आहेत. याबाबत कुठलीही माहिती मुलीला किंवा त्यांच्या सुनेला दिलेली नाही, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. एकंदरीत ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही. त्यामुळे सीबीआयने तत्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.