ETV Bharat / city

राज्यात शनिवारी 2 हजार 696 नवे रुग्ण, तर 49 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Oct 2, 2021, 11:50 PM IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. आज (शनिवारी) 2 ऑक्टोबरला 2 हजार 696 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 62 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

file photo
file photo

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. आज (शनिवारी) 2 ऑक्टोबरला 2 हजार 696 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 62 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

35 हजार 955 सक्रिय रुग्ण -

राज्यात 3 हजार 62 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 56 हजार 657 वर पोहचला आहे. तर आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 166 वर पोहोचला आहे. आज 3 हजार 62 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 77 हजार 954 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 90 लाख 74हजार 660 नमुन्यांपैकी 65 लाख 56 हजार 657 नमुने म्हणजेच 11.1 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 6 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 35 हजार 955 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 408
  • अहमदनगर - 447
  • पुणे - 294
  • पुणे पालिका - 183
  • पिंपरी चिंचवड पालिका - 95
  • सोलापूर- 145
  • सातारा - 173
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.