ETV Bharat / city

Student Agitations : विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी, चौकशीचे दिले आहेत आदेश - गृहमंत्री

author img

By

Published : Jan 31, 2022, 6:51 PM IST

Updated : Jan 31, 2022, 10:45 PM IST

SSC hsc student agitation
SSC hsc student agitation

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन ( Student Agitations ) हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी, अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) म्हणाले.

मुंबई - दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात, या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन ( Student Agitations ) केले. या प्रकरणाची चौकशीचे आदेश पोलिसांना दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी दिली आहे.

बोलताना गृहमंत्री

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन ( Student Agitations ) हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी, अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. पोलीस विभागाला याविषयी आदेश देण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांकडून विरोध सुरू आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाण मांडले होते. परीक्षेला एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे राज्यात वातावरण तंग झाले आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढल्याने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली. ग्रामीण आणि मागास भागात हा निर्णय लागू झाला नव्हता. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे देखील यात मृत्यू झाले असून कुटुंब या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाही. आता ओमायक्रॉनचा ( Omicron Variant ) धोका आहे. सरकारकडून घरी रहा, आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन केले जात आहे. शासनाच्या बैठका देखील ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. मग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन का? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करू नका, असा व्हिडिओ हिंदुस्थानी भाऊचा व्हायरल झाला. राज्यातील विविध भागात यानंतर विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलन ( Student Agitations ) केले.

हेही वाचा - Hindustani Bhau in Students Agitation : हिंदुस्तानी भाऊच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्यांच्या यांच्या घरासमोर आंदोलन!

Last Updated :Jan 31, 2022, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.