ETV Bharat / city

maharashtra monsoon session मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा देवेंद्र फडणवीस पॉवरफुल नेते, उपमुख्यमंत्र्यांच्या या कृतीने पुन्हा सुरू झाली चर्चा

author img

By

Published : Aug 23, 2022, 8:59 PM IST

chief minister eknath shinde And DCM Devendra Fadnavis
एकनाथ शिंदें आणि देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदेसोबत chief minister eknath shinde सरकार स्थापन केले आहे. मात्र या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर पॉवर Devendra Fadnavis Powerful Minister of Maharashtra असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde आणि विरोधी पक्षनेते अजित पवार opposition leader ajit pawar बोलल्यानंतर निवेदन केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.

मुंबई - शिंदे फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे cm eknath shinde असले, तरी राज्याचा कारभार खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस dcm devendra fadnavis करत आहेत अशी चर्चा सर्वत्र आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा विधानसभेत maharashtra monsoon session 2022 आला. सभागृहात मुख्यमंत्री बोलल्यानंतर अन्य मंत्री बोलत नाहीत, मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री बोलले आणि त्याला कोणीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच dcm devendra fadnavis मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm eknath shinde यांच्यापेक्षा वरचढ आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले.

ओल्या दुष्काळाबाबत सुरू होती चर्चा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात maharashtra monsoon session 2022 गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील ओल्या दुष्काळाबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेला विरोधी पक्षांकडून विविध मागणी करण्यात आली. तर सत्ताधारी आमदारांनीही आपापल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm eknath shinde यांनी सभागृहात उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनेक योजना तसेच मदत जाहीर केली.

विरोधी पक्षनेत्यांच्या उत्तरावर प्रतिक्रियांचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार opposition leader ajit pawar यांनी त्यावरील आपले मत मांडले. अजित पवार यांनी आपल्या निवेदनात, या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार असल्याची टीका opposition leader ajit pawar criticize to government केली. वास्तविक नियमाप्रमाणे यानंतर या प्रश्नावर कोणत्याही सदस्याने बोलणे उचित मानले जात नाही, किंवा सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

उपमुख्यमंत्र्यांनी केले शेवटी निवेदन विरोधी पक्षनेते अजित पवार opposition leader ajit pawar बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस dcm devendra fadnavis यांनी सभागृहात शेतकरी प्रश्नावर आणि ओला दुष्काळावर निवेदन केले. वास्तविक मुख्यमंत्री cm eknath shinde आणि विरोधी पक्षनेते opposition leader बोलल्यानंतर कोणत्याही सदस्याने बोलणे उचित नसताना उपमुख्यमंत्र्यांनी शेवटी बोलणे म्हणजे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा आपण वरचढ आहोत असेच सभागृहात दाखवून दिले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या या कृतीला कोणीही विरोध केला नाही. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील ncp leader jayant patil यांनीही बाब निदर्शनास आणून देत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याची टीका करत हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस dcm devendra fadnavis हेच वरचढ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

हेही वाचा Government will prevent farmer suicide शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी आराखडा, शिंदे सरकारचा अनोखा उपक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.