ETV Bharat / city

Corona Update India : देशात २४ तासांत १२,८९९ रुग्ण, रुग्णसंख्येत किचिंत घट

author img

By

Published : Jun 19, 2022, 7:49 AM IST

Updated : Jun 19, 2022, 11:02 AM IST

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

देशात कोरोनातून बरे होण्याचा दर 98.63 टक्के नोंदविला गेला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये रुग्णसंख्येत घट झाली तरी काहीवेळा रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्यास तिसरी लाट ओसरत असल्याचे सांगता येऊ ( Covid cases in Maharashtra today ) शकते, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली आहे.

मुंबई - . गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,८९९ रुग्ण आढळले आहेत. तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७२,४७४ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोविड-१९ची रुग्णसंख्या शनिवारी ( India Coronavirus tracker ) वाढून एकूण ४,३२,८३,७९३ झाली आहे.

शनिवारी गेल्या ११३ दिवसांत प्रथमच देशात २४ तासांत १३,०००हून अधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच ( New covid cases in India today ) वेळ होती. शनिवारीच्या आकडेवारीनुसार एका दिवसात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवरच्या एकूण मृतांची संख्या ५,२४,८४० वर पोहोचली आहे. देशात कोरोनातून बरे होण्याचा दर 98.63 टक्के नोंदविला गेला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये रुग्णसंख्येत घट झाली तरी काहीवेळा रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्यास तिसरी लाट ओसरत असल्याचे सांगता येऊ ( Covid cases in Maharashtra today ) शकते, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली आहे.

मुंबईत रोज १७००० ते १९०० रुग्णांची नोंद- मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या ( Corona news Maharashtra today ) आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यात वाढ होऊन आज सलग चौथ्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २०५४ रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५८७ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७१ रुग्ण ऑक्सिजनवर, ९७ रुग्ण आयसीयूमध्ये तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोना वाढण्याची ही आहेत कारणे - पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणत नागरिक हे बाधित होत होते. नागरिकांच्या मनात भीती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पाहिलं लसीकरण डोस घेण्यात आल. त्यानंतर ही काही नागरिकांकडून तसेच शासनाच्या आवहानानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक पुढे आले. पण त्याच वेळी तिसरी लाट ओसरली आणि निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे ज्या प्रमाणात दुसऱ्या डोससाठी आणि बूस्टर डोससाठी नागरिक पुढे यायला पाहिजे होत, तेवढ्या प्रमाणत नागरिक पुढे आलेले नाही. तसेच जी काळजी पूर्वी नागरिकांकडून घेतली जात होती. तशी काळजीदेखील नागरिकांकडून घेतली जात नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे डॉ.उदय भुजबळ यांनी दिली आहे.

नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या जगातील पहिल्या कोरोना लशीला मंजुरीची प्रतिक्षा- भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. कृष्णा एला म्हणाले, की आम्ही क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे, डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे अर्ज करू. सर्व काही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल. ही जगातील पहिली वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली कोविड-19 लस असेल.

हेही वाचा-Mumbai Corona Third Wave : पुढील २ ते ३ दिवसात तिसरी लाट ओसरल्याचे स्पष्ट होणार - सुरेश काकाणी

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत शनिवारी २०५४ नवे रुग्ण, २ रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा-Maharashtra Corona : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढते आहे; 'ही' आहेत प्रमुख कारणे, वाचा सविस्तर...

Last Updated :Jun 19, 2022, 11:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.