ETV Bharat / city

रुग्णाची संख्या वाढत असली, मात्र घाबरण्यासारखी परिस्थिती सध्या राज्यात नाही - नवाब मलिक

author img

By

Published : Jan 7, 2022, 2:17 PM IST

Nawab Malik
नवाब मलिक

गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ( Nawab Malik on Corona Situation in State ) नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

मुंबई - राज्यात आणि मुंबईत सातत्याने कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, रुग्ण संख्या वाढत असली तरी, घाबरण्यासारखे परिस्थिती राज्यात तसेच मुंबईत नाही, असं मतं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ( Nawab Malik on Corona Situation in State ) व्यक्त केले आहे. खासकरून मुंबईमध्ये गुरवारी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र, राज्य प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासनाने उपचारांच्या सर्व व्यवस्था केलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि रुग्णांनी घाबरण्यासारखी परिस्थिती सध्या राज्यात आणि मुंबईत नाही. पण राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाने कोरोनाचे जे नियम आखून दिले आहेत. त्याचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम याबाबत जी नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचे काटेकोर पालन सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन आणि नवाब मलिक यांनी केले आहे.

नवाब मलिक
पंतप्रधानाच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी -पंजाबचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंगरक्षकाबाबत घडलेला प्रकार गंभीर असून याबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये राजकारण सुरू आहे. मात्र, या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या सेटिंग यांच्यामार्फत चौकशी झाल्यास सत्य समोर येईल. तसेच या प्रकरणात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये होत असलेले राजकारण देखील थांबेल, असे मतं नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - PM Security Breach : पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; भाजपाची काँग्रेसविरोधात देशव्यापी मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.