ETV Bharat / city

CM Sahyadri Meeting : कोरोनाची सर्व खबरदारी घेवून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करुया - मुख्यमंत्री

author img

By

Published : Mar 29, 2022, 6:37 PM IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव उत्साहाने साजरा करू यात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची जयंती उत्साहाने साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवारी) बैठक बोलावली होती. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख उपास्थित होते. या बैठकीत महानगरपालिका आणि पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित असून, यासाठी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली जाणार आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव उत्साहाने साजरा करू यात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले. ही खरोखरच खूप मोठी गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

'जयंतीच्या दोन दिवस आधी परिपत्रक काढणार' : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक काढणे, तसेच जयंती साजरी करण्याबाबत जयंतीच्या दोन दिवस आधी परिपत्रक काढले जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. कोरोना काळात विद्यार्थ्यांवर झालेल्या कलम 188 अंतर्गत गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच हिंदु सणांवर राज्य सरकारकडून निर्बंध टाकले जात असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहेत. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, की विरोधकांच्या प्रत्येक आरोपावर उत्तर देण्याची गरज नाही. यासोबत मंत्री असलम शेख यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखल याबाबतचा तक्रार दाखल करण्यात आला असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

'चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने करणार पुष्पवृष्टी' : दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे कोणते जयंती उत्सव साजरे केले गेले नाहीत. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात राज्यात साजरी केली जाईल. दादर येथे असलेल्या चैत्यभूमीवर त्या दिवशी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी बैठकीनंतर दिली. तसेच नियमांचे पालन करून मिरवणुका काढण्याचे आवाहन असलम शेख यांच्याकडून करण्यात आली आहे.

निवडणुका समोर ठेवून भाजपाकडून धार्मिक मुद्दे : भारतीय जनता पक्षाला लोकांच्या भावनेशी काहीही देणे घेणे नाही. केवळ राजकारण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय मुद्दे भाजपाकडून समोर आणले जात असल्याचा आरोपही यावेळी असलम शेख यांनी केला. मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका समोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून मशिदीवरील भोंगे यांचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात तलवारीचा मुद्दाही याच कारणामुळे त्यांनी पुढे आणला. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सोबत होती, तोपर्यंत हिंदुत्ववादी होती. मात्र आघाडीसोबत आल्याने शिवसेनेचे हिंदुत्व राहिले नाही असा का भाजपा म्हणत आहे. त्यामुळे सोयीनुसार हिंदुत्वाचा मुद्दा भाजपा परत असल्याचा टोलाही असलम शेख यांनी लगावला.

हेही वाचा - Withdraw All Lockdown Violation Cases : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना काळातील 'हे' गुन्हे घेणार मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.