ETV Bharat / city

Andheri By Election : ऋतुजा लटके Vs मुरजी पटेल; कोण फडकवणार भगवा? पाहा सविस्तर रिपोर्ट

author img

By

Published : Oct 14, 2022, 10:38 PM IST

Updated : Oct 14, 2022, 10:52 PM IST

Andheri Election
Andheri Election

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly By Election ) महाविकास आघाडीतर्फे ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल ( Rituja Latke candidature application filed ) केला. तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल ( Murji Patel nomination form filled ) केला. तसेच ठाकरे गटाने संदीप नाईक यांचाही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लटके यांचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.

मुंबई : अतिशय चुरशीच्या होणाऱ्या अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Andheri East Assembly By-Election ) आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( Murji Patel nomination form filled ) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rituja Latke candidature application filed ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज भरतेवेळी या दोनही नेत्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

Rituja Latka
ठाकरे गटाकडून ऋतुजा लटकेंनी भरला उमेदवारी अर्ज

कोण आहेत ऋतुजा लटके? ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी असून, त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत तृतीय श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत होत्या. तर, रमेश लटके यांचा राजकीय जीवन प्रवास पाहता, त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेचे शाखाप्रमुख पदापासून झाली. त्यानंतर ते नगरसेवक झाले आणि त्यानंतर आमदार. असा एकूणच चढता क्रम हा रमेश लटके यांच्या राजकीय कारकीर्दीचा दिसून येतो.

Andheri Election
अर्ज दाखल महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित

ठाकरे गटाचा प्लॅन B - या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासोबतच ठाकरे गडाकडून संदीप नाईक यांनी देखील अर्ज भरला आहे. हा अर्ज भरण्यामागे निवडणुकीत ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये हे कारण असल्याचं अनिल परब यांनी सांगितले आहे. ऋतुजा लटके यांच्या निवडणूक अर्जात एखादी तांत्रिक अडचण दाखवून त्यांचा अर्ज बाद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून हा प्लॅन बी रेडी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऐनवेळी जरी निवडणूक आयोगाकडून काही तांत्रिक बाबी दाखवून ऋतुजा लटके यांचा अर्ज रद्दबातल ठरवल्यास संदीप नाईक हा ठाकरे गटाकडे पर्याय उपलब्ध असणार आहे.

छाननीत अर्ज बाद होण्याची शक्यता? - ज्यावेळी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा वाद सुरू होता त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना 'आमचा प्लॅन बी रेडी आहे. योग्य वेळी आम्ही तो तुमच्यासमोर आणू' अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. पण, निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर देखील त्याची छाननी होते. या छाननीच त्यांचा अर्ज बाद करण्याच्या शक्यता असल्याने ठाकरे गटाकडून हा प्लॅन बी तयार ठेवण्यात आल्याचं अनिल परब यांनी सांगितले.

Total number of voters
एकूण मतदार संख्या

कोण आहेत संदीप नाईक? - संदीप नाईक हे अंधेरीतील माजी नगरसेवक असून, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, निवडणूक आयोगाने ऋतुजा लटके यांचा अर्ज मान्य करून घेतल्यास संदीप नाईक हे अर्ज मागे घेतील, असे देखील अनिल परब यांनी सांगितले. मात्र, ठाकरे गटाच्या या खेळीमुळे आता फक्त भाजप व शिंदे गटाचे नाही तर खुद्द ऋतुजा लटके यांचे देखील टेन्शन वाढले आहे.

मुरजी पटेल यांनी भरला उमेदवारी अर्ज - अतिशय चुरशीच्या होणाऱ्या अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Assembly by-elections ) आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ( Nomination form filled by Murji Patel ) आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना मी 35000 हजार मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोण आहेत मुरजी पटेल? भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मुर्जी पटेल यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेस मधून सुरुवात झाली. काँग्रेस मधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला व भाजपला पाठिंबा दिला. आता त्यांनी या पोटनिवडणुकीत भाजपच्या चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर अंधेरीतील झोपू योजनेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले. त्यानंतर त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र बोगस आढळल्याने त्यांचं नगरसेवक पद देखील रद्द करण्यात आलं होतं. अखेर त्यांनी जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपलं राजकीय करियर सावरण्याचा प्रयत्न केला.

पटेल यांच्या बाजूने बावनकुळे, शेलार उपस्थित - शिवसेनेचे अंधेरी पूर्व येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, भाजप नेते प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंह हे उपस्थित होते.

लटके यांच्या बाजूने महाविकास आघाडी - दुसरीकडे ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते. शिवसेनेकडून खुद्द आदित्य ठाकरे, अनिल परब, रवींद्र वायकर हे नेते उपस्थित होते. तर, काँग्रेस कडून भाई जगताप, चरण सिंग सप्र यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीचे देखील अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.

शक्तीप्रदर्शन नसून स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा - अर्ज भरण्यापूर्वी मुरजी पटेल, ऋतुजा लटके या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोनही गटाच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दोन्ही बाजूच्या युतीच्या नेत्यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.

उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महानगरपालिकेतील पुढील वाटचाली अवलंबून असणार आहेत. त्यातच या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या महापालिकेतील नोकरीच्या राजीनाम्यानंतर प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे.

निवडणुका जाहीर चिन्हाचा वाद रंगला - केंद्रीय निवडणूक आयोगाने या जागेची पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर पहिला वाद रंगला तो म्हणजे चिन्हाचा. कारण, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर नेमकं कोण लढणार? हा वाद सुरू झाला. त्यावेळी हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला चिन्ह संदर्भात निर्णय घेण्यासाठी दिलेली स्थगिती उठवत याबाबत निर्णय घेण्याचे त्यांना आदेश दिले. अखेर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत शिंदे गटाला ढाल तलवार व ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं. सोबतच शिवसेना हे नाव देखील तात्पुरतं गोठविण्यात आलं.

लटके राजीनाम्यासाठी लटकले... चिन्हा नंतर दुसरा वाद सुरू झाला तो म्हणजे उमेदवारीचा. ठाकरे गटाकडून उमेदवार आधीच निश्चित झाला होता. पण, ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यातील काही तांत्रिक बाबींमुळे त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नव्हता. दिवस निघून जात होते मात्र राजीनामा स्वीकारला जात नसल्याने अखेर ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल देत बृहन्मुंबई महानगरपालिकेला राजीनामा मंजूर घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर अखेर आज ऋतुजा लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात झुंज - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक ( Andheri Assembly Constituency ) येत्या तीन नोव्हेबरला होणार आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके ( Late Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर होणारी निवडणूक ( Andheri Election ) अत्यंत चुरशीची असणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप ( Shiv Sena vs BJP ) अशी थेट लढत असली तरी शिवसेनेतील फुटीर शिंदे गटाची भाजपा उमेदवाराला मदत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघ ( Andheri Assembly Constituency ) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत ( Andheri Assembly Election ) शिवसेना चुरशीने लढणार आहे. मोठमोठ्या सभा घेण्याऐवजी प्रत्यक्ष मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर शिवसेनेचा भर ( Shiv Sena contact voters directly ) असणार आहे. रमेश लटके यांचे मतदारसंघातील काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रणनीती आखल्याचे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांनी सांगितले.

सेना विरुद्ध भाजप सामना - दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे.(Andheri by poll election). शिवसेनेची या मतदार संघावर मजबूत पकड आहे. आता होणाऱ्या पोट निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र या निवडणूकीत शिवसेनेचे पारडे जड असून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेला ( Rituja Latke ) मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. ( shiv sena favorite in andheri by poll election ).

सर्वसमावेशक मतदारसंघ - अंधेरी पूर्वेकडील साकीनाका ते महाकाली गुंफा परिसर, अंधेरी एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गुंदवली, एसिक रुग्णालय, भवानी नगर, विजय नगर, लार्सन अँड टुब्रो पॉवर कॉम्प्लेक्स, पवईचा काही भाग, अंधेरी-कुर्ला रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गालगतचा भाग या मतदारसंघात येतो. कोकणातील मंडळी या भागात मोठ्या संख्येने राहतात. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग याशिवाय सामाजिक व आर्थिक कारणांमुळे झोपडपट्टीत राहणारा वर्गही या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. एका अर्थाने कॉस्मोपोलिटन चेहरा असलेल्या या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि देशभरातील विविध प्रांतातून आलेली मंडळी गुण्यागोविंदाने राहत आहेत. काँग्रेसचा परंपरागत मतदार या भागात असला तरी मुंबईच्या राजकारणाचा बदलत्या काळात या भागात सत्ताधारी शिवसेना रुजली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला - एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व या मतदार संघात होते. मात्र, आता काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शिवसेनेने विकासकामांच्या जोरावर गेल्या दहा वर्षांपासून येथे पाय रोवले आहेत. भाजपा कॉंग्रेसमधून आलेल्या मुरजी पटेल यांच्या माध्यमातून मतदार संघावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील विधानसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर येत्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल पुन्हा नशीब आजमवणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती. आता मतांचे विभाजन होणार आहे. परंतु, हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेचा लाभ ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांना होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाची गोची - एखाद्या मतदारसंघातील आमदाराचे निधन झाल्यास रिक्त झालेल्य़ा जागेवर त्यांच्या कुटूंबियांपैकी कोणी उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची नाही, असा महाविकास आघाडीचा अलिखित नियम आहे. त्यामुळे शिंदे जर शिवसेना म्हणून सांगत असतील तर, ते या नियमाच्याविरोधात वागतील का, जर त्यांनी स्वतः उमेदवार दिला नाही, भाजपच्या उमेदवाराला मदत केली तरीही तै नैतिकदृष्ट्या त्यांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाची या निवडणूकीत नैतिक गोची झाली आहे.

भाजपला शिंदे गटाचे पाठबळ - शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन स्थानिक मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय रमेश लटके यांचे मतदार संघातील कार्य सहाय्यभूत ठरेल असे शिवसेनेला वाटतं. तर मुरजी पटेल या भाजपच्या बंडखोर उमेदवाराला यावेळी भाजप अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. पटेल यांनी गेल्या निवडणुकीत लटके यांना चांगली टक्कर दिली होती. त्यातच आता शिंदे गटाचे पाठबळ आणि भाजपच्या अधिकच्या ताकदीच्या बळावर ही जागा जिंकून आणता येईल असा विश्वास भाजपचे प्रवक्ते अजय सिंह यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस,राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा - कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा ( Congress, NCP support Shiv Senab ) राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग गेली अडीच वर्षे चालला. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) कोसळले. सध्या शिंदे गट, भाजपचे सरकार सत्तेत आहेत. आगामी निवडणुका देखील शिंदे गट, भाजप युतीत लढणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या अंधेरीच्या पोट निवडणुकीत शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मनसेची भूमिका गुलदस्त्यात अंधेरी पूर्व मतदार संघात मनसे प्रमुख राज ठाकरेंना ( MNS chief Raj Thackeray ) मानणारा वर्ग आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेने स्वतंत्र लढेल, असे संकेत दिले आहेत. वरळी विधानसभा मतदार संघ वगळता, मनसे आजवर शिवसेनेविरोधात उमेदवार देण्याची भूमिका कायम राखली​​ आहे. शिवसेनेतील दोन गटानंतर राजठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेत आहेत. आगामी पोट निवडणुकीत मनसेची भूमिका गुलदस्त्यात आहे.

शिवसेना घरोघरी जाणार - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी फिरण्याची शिवसेनेला गरज नाही. या मतदारसंघात मोठ मोठ्या सभा घेण्यापेक्षा रोजच्या संपर्कातील लोकांना प्रत्यक्ष भेटणार आहोत. दिवंगत रमेश लटके यांनी केलेल्या कार्याच्या आधारावरच मते मागणार असल्याने लोकांशी थेट घरोघरी जाऊन संपर्क साधणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. या मतदारसंघात बहुभाषिक मतदार असले तरी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेलाच मते मिळतील तर स्थानिक कार्याच्या जोरावर बहुभाषीक मतदार लटके यांनाच पसंती देतील, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. या शिवाय या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची या मतदारसंघातील बळाचाही आम्हाला फायदा होणार आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसने २७ हजार मते घतेली होती हे विसरूनही चालणार नाही, असेही परब म्हणाले.

चिन्हा शिवाय लढण्याचाही पर्याय - शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच सुनावणी होणार आहे. या सुनावणी चिन्ह शिवसेनेसोबतच राहील असा विश्वास शिवसेनेला वाटतो होता. मात्र, शिवसेनेचे चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे शिवसेना उगवता सूर्य. मशाल, तलवार अथवा गदा यापैकी एक चिन्ह घेऊन लढण्याचा पर्याय शिवसेनेने ठेवला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मतदार संघाची मतदार संख्या, भाषिक रचना? या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 71 हजार 668 इतकी आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 46 हजार 780 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 24 हजार 887 इतकी आहे. एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश या मतदारसंघात होतो. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक मतदारांचे (North Indian and Marathi speaking voters) समसमान प्रमाण आहे. त्या पाठोपाठ मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे लोक या मतदारसंघात आढळतात.

काय आहेत मतदारसंघातील अडचणी ? प्रभागानूसार पाहायचे झाल्यास वॉर्ड क्रमांक ८० मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची (एसआरए) (Slum Rehabilitation Scheme) मोठी समस्या आहे. येथील रहिवासी दहा-बारा वर्षे घरापासून वंचित आहेत. वॉर्ड क्रमांक १२१, ७६, ८१ मध्ये रस्त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे. वॉर्ड क्रमांक ७५ म्हणजे कृष्ण नगरमधील मोठा नाला साफ होत नसल्यामुळे तेथील सर्व नाले पावसाळ्यात तुडुंब भारतात. परिणामी या नाल्याचे पाणी बाहेर आल्याने मरोळ परिसर जलमय होतो. त्याचबरोबर कदमवाडीतील रोड रुंदीकरण विकास योजना दहा वर्षांपूर्वीच मंजूर होऊन अद्याप त्यासंदर्भात पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तिथून एकावेळी एकच गाडी ये-जा करू शकते आणि त्यामुळे प्रचंड वाहतुककोंडी होत असते.वाहतुकीची मोठी कोंडी, दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सेवासुविधांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळ्यात सखल भागात तुंबणारे पाणी, आरोग्याचा प्रश्न, सांडपाण्याचा निचरा या प्रमुख नागरी समस्या स्थानिकांना भेडसावतात.

Last Updated :Oct 14, 2022, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.