ETV Bharat / city

Maharashtra Bullet Train Fund बुलेट ट्रेनसाठी कोट्यवधीची तरतूद करुन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 22, 2022, 9:53 PM IST

Bullet Train Fund
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve Attack On Eknath Shinde Government यांनी बुलेट ट्रेनला दिलेल्या निधीवरुन एकनाथ शिंदे सरकारवर cm eknath shinde चांगलीच सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या निधीवरुनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने निधी देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही chhatrapati shivaji maharaj smarak हात आखडता घेतल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

मुंबई - एकनाथ शिंदे सरकार आपल्या पुरवणी मागण्यांत बुलेट ट्रेनसाठी Ambadas Danve Attack On Eknath Shinde Government तरतूद करते, मात्र घोषणा करूनही शेतकऱ्यांसाठी मदतीची तरतूदच केली नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शिंदे सरकारने केला, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी Ambadas Danve Attack On Eknath Shinde Government On Bullet Train Issue सरकारवर केला. सरकारने निधी देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही chhatrapati shivaji maharaj smarak हात आखडता घेतल्याचा आरोप दानवे यांनी करत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत शिंदे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणीबाबत योजना केल्या रद्द शिंदे सरकारने २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या Supplementary Demand सादर केल्या आहेत. मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत ४.७१ टक्के एवढे हे प्रमाण आहे. आठ विभागांवर सभागृहात चर्चा ठेवण्यात आली आहे. या आठ खात्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद आहे. पण उर्वरीत ज्या खात्यांवर १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्या खात्यांविषयी सभागृहात चर्चा न करताच त्याला मंजुरी दिली जाणे चुकीचे असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संभाजी महाराज chhatrapati shivaji maharaj smarak व शाहू महाराज Chhatrapati Shahu Maharaj smarak यांच्या स्मारक उभारणीशी संबधित योजनाही शिंदे सरकारने रद्द केल्याचा आरोप दानवेंनी केला. गोडबोले समितीने सुचविल्याप्रमाणे विभागनिहाय ५ ते १० टक्के तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये कराव्यात, असे म्हटले होते. पण ही शिफारस सुद्धा पाळली नसल्याची टीका त्यांनी केली.

आता तरी जीएसटी मिळवा एकनाथ शिंदे सरकारने eknath Shinde government सत्तेत आल्यानंतर जवळपास ५५० जीआर काढले आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या Shiv Sena Chief Uddhav Thackeray काळातील जास्तीत जास्त योजना बंद करण्यासाठीच हे जीआर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सामाजिक, भौगोलिक विकास असलेल्या योजनाच शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर बंद केल्या आहेत. जनावरे, गुरे यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठया प्रमाणात रुग्णालयाची आवश्यकता आहे. पशु संवर्धन रुग्णालयातील अनेक रिक्त पद भरण्यात यावीत. तसेच महाविद्यालयाची संख्या वाढवून खासगी प्रॅक्टीसला मान्यता द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्याने आता तरी केंद्र सरकार जीएसटीचा परतावा वेळेवर देईल, असा टोलाही अंबादास दानवे Ambadas Danve Attack On Eknath Shinde Government यांनी लगावला.

मराठवाडा विकासासाठी पॅकेज मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ ला स्वतंत्र झाला. मराठवाडा यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.

हेही वाचा Cyber Crime Capital नेपाळमध्ये सायबर गुन्ह्यांचे केंद्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.