ETV Bharat / city

Kolhapur news : कोल्हापूर जिल्हातील ठळक घडामोडी पहा एका क्लीकवर

author img

By

Published : Oct 16, 2022, 2:11 PM IST

Kolhapur news
कोल्हापूरातील ठळक घडामोडी

दिवसभरात कोल्हापूर जिल्हात काय धडले पहा एका क्लीकवर ....कोल्हापूरातील ( Kolhapur News ) ठळक घडामोडी

1) आता रायगडच्या संवर्धनासाठी पोलंडचे तज्ञ प्रयत्न करणार


कोल्हापूर : आता दुर्गराज रायगडच्या संवर्धनासाठी पोलंडचे तज्ञ (Polish experts for conservation of Durgaraj Raigad ) प्रयत्न करणार आहेत. पोलंड देशाचे राजदूत अडम बुराकोवस्की ( Ambassador Adam Burakowski ) यांच्यासह डॉ. बार्बरा क्रतिक यांच्या पोलंड मधील वास्तू व संवर्धन क्षेत्रातील तज्ञांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथील निवासस्थानी संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. ही तज्ञांची टीम भारतातील दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व बेंगलुरू विद्यापीठ सोबत संलग्न होती. यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शास्त्रशुद्ध पद्धतीने गुजरात व राजस्थान येथील पुरातन वाड्यांचे संवर्धन केलेले आहे. या भेटीवेळी दुर्गराज रायगड सह महाराष्ट्रातील गडकोटांच्या संवर्धन बाबत विस्तृत चर्चा झाली.


पोलंडच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड संवर्धनासाठी योगदान ? राजदूत अडम बुराकोवस्की यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्ञात आहे. ते याआधी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यास व दिल्ली येथे शिवजयंती महोत्सवास देखील उपस्थित राहिलेले आहेत. पोलंडच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून दुर्गराज रायगड संवर्धनात पोलंड देशाचे योगदान देण्यासाठी ते इच्छुक असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

2) भाडोत्री शिवसैनिक म्हणणाऱ्या खासदार मंडलिक यांच्याविरोधात बिंदू चौकात निदर्शने; म्हणाले..


कोल्हापूर : कोल्हापूरातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना खासदार बनवले तेच आता या शिवसैनिकांना भाडोत्री बोलत आहेत याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिवाय प्रतिज्ञापत्र दिलेले सर्वजणांची चौकशी झाली आहे. त्यामुळे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आशा भाडोत्री लोकांची गरज नाही. मात्र संजय मंडलिक यांनी कट्टर शिवसैनिकांना भाडोत्री बोलून त्यांच्या भावनेंचा अनादर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याच मंडलिक यांचा न भूतो न भविष्यती अशा मतांनी धूळ चारतील असेही यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी म्हंटले.

3) उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावरील दाव्याच्या वादामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे यांना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांचे शिवसेना या नावास मान्यता देत तलवारढाल असे चिन्ह दिले आहे. मात्र ठाकरे गटा कडून आज कोल्हापुरात भर पाऊसात मशाल हतात घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. ही क्रांतीची मशाल असून ही क्रांती म्हणजे आम्हाला धोका देणाऱ्याना नाश करणारे क्रांती असेल असे शिवसैनिक म्हणाले आहेत.

भर पाऊसात मशाली हातात घेत शक्तिप्रदर्शन: निवडणूक आयोगाने शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवत ठाकरे गटाला मशालीच चिन्ह दिला आहे तसेच शिवसेना हे नाव न वापरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आज कोल्हापुरात जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक शिवसैनिक युवासैनिक व महिला एकत्र येत भर पावसात मशाली हातात घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठे शक्ती प्रदर्शन केले वरून पावसाच्या मोठ्या सरी बरसत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक धगधगती मशाल घेत उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणत शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देत होते. यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे,आसिफ अत्तार, मंजित माने, जोतिर्लिंग चौगुले,सचिन मांगले, स्मिता मांडरे,दीपाली शिंदे,दिनेश परमार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


ही मशाल प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना पराभूत करेल :यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव घेऊन आणि मशाल चिन्ह घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ही धगधगती मशाल आज आम्ही पेटवलेली आहे. ही मशाल हे क्रांतीची मशाल असून देशात अनेक क्रांती झाले आहेत मात्र ही क्रांती आम्हाला धोका देणाऱ्यांची नाश करणारी क्रांती आहे. ज्या पद्धतीने शिंदे गटानी मातोश्रीचा विश्वासघात केला त्यांचा हे मशाल प्रत्येक निवडणुकीत पराभूत करेल आणि याची सुरुवात अंधेरी पोटनिवडणुकीपासूनच होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच ढाल तलवारीवर मशाल हे भारी पडेल असे ते यावेळी म्हणाले आहेत.


दिघे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा हा विचार तुम्हाला का आला नाही : शिंदे गटाला आज ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाले आहे याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना विचारले असता याबाबत ते बोलताना म्हणाले कदाचित शिंदे गटाची उतरती काळा सुरू झाली आहे. आम्ही मागणी केलेल्या मध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे या कोणालाही विसरलो नाही मात्र विरोधकांनी बंड केला तेव्हा ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचे पोस्टर लावत क्रांती घडवल्याचे म्हणाले मात्र नाव पाठवताना तीन नावांमध्ये निदान एका मध्ये तरी दिघे साहेबांची इच्छा व्यक्त करायची होती दिघे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा हा विचार तुम्हाला का आला नाही. बाळासाहेब नाव त्यांच्या पक्षाला आहे मात्र कोणते बाळासाहेब याचे उत्तर त्यांनी द्यावा असेही संजय पवार यावेळी म्हणाले आहेत.

4) शिंदे गटाला मिळालेले बाळासाहेबांचे नाव :

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावरील दाव्याच्या वादामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे यांना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांचे शिवसेना या नावास मान्यता दिली आहे. याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना विचारले असता यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेला 56 वर्षाचा इतिहास आहे जो शिंदे गटाकडे नाही असे म्हणत शिंदे गटाला मिळालेले बाळासाहेबांचे नाव म्हणजे कोणते बाळासाहेब हे त्यांनी स्पष्ट करावे असे म्हणाले आहेत ते आज कोल्हापुरात बोलत होते.

धनुष्यबाण चिन्ह गोठवत ठाकरे गटाला मशालीच चिन्ह : निवडणूक आयोगाने शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवत ठाकरे गटाला मशालीच चिन्ह दिला आहे. तसेच शिवसेना हे नाव न वापरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व शिवसैनिकांनी केले असून मशाल हे क्रांती घडवण्याचे एक ताकत असून याबद्दल क्रांती घडत आहे. या मशालीच्या माध्यमातून राजकीय विरोधकांचा नाश आम्ही नक्की करू असा विश्वास कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे आमच्या मनात असून मुंबईकरांची आणि महाराष्ट्राची आत्मा आहे. चिन्ह नवीन आहे पक्षाचे नाव देखील नवीन आहे. मात्र आम्हाला 56 वर्षाचा इतिहास आहे जो शिंदे गटाकडे नाही शिंदे गटाने घेतलेले बाळासाहेबांचे नाव म्हणजे कोणते बाळासाहेब हे आता लोक विचारू लागले आहेत शिंदे यांनी सपष्ट करावे बाळासाहेब म्हणजे कोणते बाळासाहेब पाटील की बाळासाहेब कदम की बाळासाहेब सावंत असा सवाल हे त्यांनी यावेळी विचारला आहे.

5) काँग्रेसला बळ देण्यासाठी सतेज पाटलांचे एक पाऊल पुढे; भारत जोडो यात्रा कोल्हापुर जिल्ह्यात गावोगावी पोहोचवणार

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची गेल्या काही दिवसांपासून भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. केरळ ते जम्मूकाश्मीर पर्यंत जवळपास 3 हजार 570 किलोमीटर ही पायी यात्रा होणार आहे. हीच यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत ही यात्रा पोहोचावी आणि यात्रेचा उद्देश पोहोचावा यासाठी 1239 गावांमध्ये यात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एकीकडे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठं अपयश मिळाले होते मात्र सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 4 आमदार निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आता तेच सतेज पाटील कॉंग्रेसचे काम आणि भारत जोडो यात्रा घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढेच 100 दिवस ते हा उपक्रम सुरू ठेवणार आहेत.

कोल्हापुरात काँग्रेसचा भारत जोडो यात्रेंतर्गत पहिला मेळावा; दिग्गजांची उपस्थिती : भारत जोडो यात्रेंतर्गत आज शनिवारी काँग्रेसच्या वतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. दसरा चौकातील दसरा मैदानात हा मेळावा होत असून काँग्रेसचे दिग्गज नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील एक हजार 239 गावे, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर, तसेच जिल्ह्यातील सर्व 13 नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रांत तेरा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या गावांगावांत हा मेळावा दाखवण्याचा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.