ETV Bharat / city

People's Reaction On Covid 3rd Wave : यापुढे लॉकडाऊन नको, औरंगाबादकर म्हणतात आता पर्याय शोधा

author img

By

Published : Dec 8, 2021, 12:32 PM IST

Updated : Dec 8, 2021, 5:20 PM IST

तिसरी लाट
तिसरी लाट

कोरोनाची तिसरी लाट (Covid 3rd Wave) येण्याचा धोका असताना सरकारकडून लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सरकारने यापुढे लॉकडाऊन (No more lockdown) न लावता त्यावर योग्य असा पर्याय शोधण्याची (Find Alternatives) मागणी नागरिकांमधून होत आहे. ईटीव्ही भारतने औरंगाबादेतील (Aurangabad) नागरिकांशी संवाद साधला असता नागरिक बोलत होते.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी शासनातर्फे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता कुठे तरी नागरिकांना दिलासा मिळत आहे. असे असताना कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट (New Covid 19 Variant) असलेल्या ओमायक्रॉन व्हायरसने (Omicron Virus) नागरिकांना तिसऱ्या लॉकडाऊनची धास्ती लावली आहे. या व्हायरसने देशात शिरकाव केल्याने (Omicron In India) आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय, असा प्रश्न सारसमान्यांना पडला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास सरकारने लॉकडाऊन लावू नये, त्यासाठी दुसरा पर्याय निवडावा, असा सूर सर्वसामान्य जनतेमधून ईटीव्हीशी बोलतांना उमटला.

कोरोनाची तिसरी लाट
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतांना ओमायक्रॉन या विषाणूने देशात शिरकाव केला. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांना लसीकरण (Covid Vaccination) करून घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन वेगवेगळे प्रकार करत आहे. राज्यात लसीकरणाच्या आकडेवारीत जिल्हा १६ व्या क्रमांकावर आहे.व्यावसायिकांना चिंताअनेक व्यावसायिकांनी बँकेकडून कर्ज (Bank Loan) काढून व्यवसाय उभारले आहेत. गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे बँकेचे हप्ते थकले. यामुळे छोटे -मोठे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन लागलं तर, व्यवसाय पूर्णपणे जातील, याची चिंता आता व्यावसायिकांना लागली आहे. असे झाल्यास बँकेचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.
Last Updated :Dec 8, 2021, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.