ETV Bharat / business

Diversified Investments : वैविध्यपूर्ण गुंतवणूक म्हणजे महागाई आणि मंदीपासून बचाव; पाहा यावरील खास रिपोर्ट

author img

By

Published : Oct 14, 2022, 2:59 PM IST

भारतात अलीकडच्या काळात महागाई ( Diversity in Investment Portfolio ) 6 टक्क्यांच्या वर आहे. अशा वेळी, भविष्यात वाढत्या ( Best Investments to Combat Inflation ) खर्चावर मात करण्यासाठी ( Assures Returns During Economic Slowdown ) जास्तीत जास्त ( RBI Steps to Rein in Inflation ) परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा शोध घेणे आवश्यक आहे. वैविध्यपूर्ण गुंतवणूक, सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातू आणि पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIPs) महागाई आणि आर्थिक मंदी असतानाही आम्हाला खात्रीशीर परतावा कसा देतात ते पाहा.

Diversified Investments
वैविध्यपूर्ण गुंतवणूक म्हणजे महागाई आणि मंदीपासून बचाव

हैदराबाद : अलीकडच्या काळात महागाई ( Diversity in Investment Portfolio ) हा आपल्या ( Best Investments to Combat Inflation ) सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ( Assures Returns During Economic Slowdown ) गेल्या काही आठवड्यांपासून भारतात महागाईचा दर ६ टक्क्यांच्या वरच आहे. या पार्श्‍वभूमीवर, गुंतवणूकदारांनी ( RBI Steps to Rein in Inflation ) अशा धोरणांचा शोध घेतला पाहिजे. ज्यामुळे चलनवाढीपेक्षा जास्त परतावा मिळेल. तरच ते भविष्यात वाढत्या खर्चाला तोंड देऊ ( Diversified Investments ) शकतील.

तत्काळ परतावा देणार्‍या सर्व प्रकारच्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करण्याची सर्वसाधारण प्रवृत्ती असते. बरेच लोक दीर्घकालीन परताव्याऐवजी अल्पमुदतीच्या नफ्याकडे लक्ष देतात. ज्यामुळे शेवटी कमकुवत गुंतवणूक पोर्टफोलिओ होतो. महागाईला तोंड देऊ शकतील, अशा गुंतवणुकीसाठी धोरणे निवडण्याची निश्चित योजना नाही. परंतु, काही धोरणे आम्हाला आमच्या गुंतवणुकीवर महागाईचा प्रभाव रोखण्यासाठी मदत करतील.

आमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील विविधता हा महागाईचा सामना करण्याचा एक निश्चित मार्ग आहे. दरवाढीचा प्रभाव प्रत्येक धोरणानुसार वेगवेगळा असतो. गुंतवणूकदारांनी हे काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजे. बाजारातील चढउताराच्या काळात, विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा पर्याय निवडून जोखीम घटक कमी करता येतो. एका भौगोलिक प्रदेशापुरते मर्यादित न राहता विविध देशांच्या बाजारपेठेत पैसा टाकला पाहिजे.

कोणतीही गुंतवणूक अशा पद्धतीने असावी की, त्यातून चलनवाढीचा दबाव असूनही, त्यातून काही लक्षणीय उत्पन्न मिळावे. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनी जोखीम आत्मसात करण्याची त्यांची क्षमता वाढवली पाहिजे. त्यानुसार त्यांच्या आर्थिक योजना बनवाव्यात. उच्च जोखमीचा धोका असलेल्या योजना सर्व लोकांसाठी योग्य नसतील.

मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणे हे मोठ्या प्रमाणात चलनवाढीच्या जोखमीपासून बचाव आहे. जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो. तेव्हा आपण पाहू शकतो की, सोने आणि चांदीसारखा धातू किमती वाढीचा प्रभाव कसा सहन करतात. दोन मौल्यवान धातूंचा भारतीयांशी सामाजिक-आर्थिक आणि मानसशास्त्रीय घटकांच्या दृष्टीने अतूट संबंध आहे. म्हणून, सोने आणि चांदीच्या ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक केली जाऊ शकते. शिवाय, या ईटीएफच्या कामगिरीवर इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडाचा परिणाम होत नाही. आर्थिक मंदीच्या काळात या मौल्यवान धातू गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहेत.

प्रत्येक गुंतवणूकदाराने हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा त्यांच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळतो तेव्हाच ते महागाईच्या प्रभावावर मात करू शकतात. यासाठी इक्विटी हा एक पर्याय आहे. शेअर बाजाराविषयी सजग जागरूकता आणि सतत लक्ष ठेवून, आम्ही अत्यंत विश्वासार्ह शेअर्स निवडू शकतो. त्याच वेळी, काही कंपन्यांचे समभाग निवडणे आणि त्यांना पोर्टफोलिओमध्ये जोडणे फायदेशीर नाही. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

पर्यायी म्युच्युअल फंडांनाही प्राधान्य दिले जाऊ शकते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) मध्ये गुंतवणूक करून दीर्घ मुदतीत खात्रीशीर परतावा मिळू शकतो. त्याच वेळी, महागाईच्या गंभीर परिणामापासून वाचण्यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्याची क्षमता वाढवताना आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि आपल्या कौटुंबिक बजेटवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.