ETV Bharat / bharat

शिवसेनेची बंडखोरांबाबत कठोर भूमिका; वाचा, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी

author img

By

Published : Jun 26, 2022, 10:24 AM IST

Updated : Jun 26, 2022, 11:16 AM IST

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी

शिवसेना आता मुंबईत पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. जलद बैठका बोलावल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले जात असून निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची चर्चा आहे. सरकार वाचवण्यापेक्षा पक्ष वाचवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'चे नॅशनल ब्युरो चीफ राकेश त्रिपाठी यांनी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याशी खास बातचीत केली.

नवी दिल्ली - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना "पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर" कारवाई करण्याचे अधिकार देणारा ठराव मंजूर केला. शिवसेना बंडखोरांबाबत कठोर भूमिका घेत आहे. जाणून घ्या शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी या मुद्द्यावर काय म्हणाल्या.

प्रश्न- निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्याच्या निर्णयानंतर बैठका काय सिद्ध करत आहेत? हा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न आहे का?

उत्तर- बघा, आम्हाला खात्री आहे की आम्ही सरकार आणि पक्षाला वाचवू. आमच्या पक्षातील ही चौथी बंडखोरी असून त्यावरही आम्ही मात करू. जे काही सिद्ध करायचे आहे, सरकार जाणार की राहणार, ते विधानभवनात करायचे आहे. ते गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही. आम्ही त्यांच्यासाठी संपूर्ण विधानसभा स्थलांतरित करू किंवा नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तुम्ही मुंबईत या आणि मुंबईत जे करयायचे आहेत ते करा असही त्या म्हणाल्या आहेत.

त्यांचा दावा दोनतृतीयांश विधानसभेतच आहे, ते बहुमत त्यांना वापरता येणार नाही. कारण सर्व आमदारांना एकतर भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल किंवा अपात्र ठरल्यानंतर त्यांना नवा पक्ष म्हणून विजयी व्हावे लागेल. दहाव्या अनुसूचीनुसार विधानसभेत त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असले तरी त्यांना विधानसभेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यावरच मतदानाचा अधिकार असेल. मात्र, ते सामील झाले नाहीत आणि नव्या पक्षाची चर्चा केली तर ते सर्व अपात्र ठरतील आणि त्यांना त्याच पक्षाच्या चिन्हावर लढावे लागेल. पण त्यांना अपात्र ठरवल्यावर त्यांचे नाव जनतेच्या लक्षात राहणार नाही, याची मी खात्री देते असही त्या म्हणाल्या.

प्रश्न- मग आता पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाणार का?

उत्तर- निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरज नाही. त्यांच्याकडे संसदेपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत दोन तृतीयांश लोक असतील, तर निवडणूक चिन्हाचा मुद्दा असेल, हे अगदी स्पष्ट आहे. केवळ विधानसभेच्या जागांसाठी नव्हे तर संघटनेच्या दोन तृतीयांश लोकांबद्दल बोलायचे आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली की संपूर्ण संघटनेतच फूट पडली याचा उल्लेखही त्यांनी केला.

प्रश्‍न- शिवसेनेत आत्मचिंतनाची चर्चा आहे, की चर्चेची उणीव आहे?

उत्तर- बंडखोर गटाने असे कृत्य कोणत्या कारणास्तव केले, त्यांच्यावर का किंवा कशाचा दबाव होता किंवा त्यांच्याच महत्त्वाकांक्षेमुळे असे घडले, या सर्व गोष्टी आम्ही शोधू, पण इथे हे लोक इतके प्रयत्न करत आहेत की ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांचे नावही आपल्या पक्षाशी जोडत आहेत. म्हणजेच स्वबळावर जिंकता येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यासाठीही बाळासाहेबांचे नाव हवे. अडीच वर्षांनी हिंदुत्वाबद्दल बोलतायेत. पाठीत खंजीर खुपसला जातो हे कोणते हिंदुत्व शिकवते? बाळासाहेब जे सांगायचे ते करायचे. तुम्ही लोक ते देशद्रोही आहात जे त्यांच्या म्हणण्याविरुद्ध गेले आहेत.

प्रश्न- शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती अनैसर्गिक असल्याचीही चर्चा पक्षात सुरू आहे का?

उत्तर- ही युती झाली तेव्हा एकनाथ शिंदे असोत की गुलाबराव पाटील असोत की दादा भुसे असोत नाहीतर पेंढारे असोत. या सर्वांचा विचार करून युतीचा निर्णय घेण्यात आला. ये तानाजी सावंत जे आता तिथे बसले आहेत, त्यांना आपण भाजपशी युती करून बसलो आहोत याचा खूप राग आला आणि ती युती (भाजपशी) तोडण्याची त्यांची मागणी होती. एकनाथ शिंदे यांचे (2015)चे भाषण ऐका ज्यात ते म्हणाले होते की मी राजीनामा द्यायला तयार आहे, मी त्यांच्यासोबत (भाजप) काम करायला तयार नाही. आज जी महाविकास आघाडी स्थापन झाली, त्या सर्व जबाबदाऱ्या तुम्हाला दिल्या, तुम्ही कोणत्या कारणासाठी पळून गेलात, हे तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे लागेल असही म्हणाल्या आहेत.

प्रश्न- आता शिवसेनेचे हिंदुत्व बाळासाहेबांचे राहिलेले नाही, असे बोलले जात आहे.

उत्तर- आपलं हिंदुत्व पातळ करायचं हा मीडियाचा अजेंडा राहिला आहे. कोर्टातून राम मंदिराचा निर्णय आला तेव्हा रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पहिले राजकारणी होते. रामललाच्या मंदिराला देणगी देणारा शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता. हिंदुत्व शासन आणि वसुधैव कुटुंबकम याविषयी बोलणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे. या वसुधैव कुटुंबकममुळे त्यांनी कोविड चांगल्या प्रकारे हाताळले, कोण आमच्या बाजूने आणि कोण आमच्या विरोधात, असा कोणताही भेदभाव न करता. उद्धव ठाकरे हे एकमताने सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री मानले जातात. हिंदुत्व धर्माचे पालन करताना त्यांनी हे सर्व केले आहे. हिंदुत्वापासून आपण दूर झालो हा भाजपचा अजेंडा आहे.

हेही वाचा - Teesta Setalvad: मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट यांना अटक; गुजरातला हलवले

Last Updated :Jun 26, 2022, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.