ETV Bharat / bharat

Manipur Violence : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये घेतली उच्चस्तरीय बैठक

author img

By

Published : May 30, 2023, 10:20 PM IST

union home minister amit shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मणिपूर हिंसाचाराच्या बातम्यांनंतर अमित शाह चार दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी रात्री मणिपूरला पोहोचले. रात्री, उशिरा त्यांनी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली. शहा तेथे पोहोचताच त्यांची महत्त्वाची बैठक झाली. यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी पुढील धोरण आखले.

तेजपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चार दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी रात्री मणिपूरला पोहोचले. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी शाह यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर सोमवारी अमित शहा यांनी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेतली. त्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री, वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यादरम्यान, गृहमंत्र्यांनी राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी रणनीती ठरवली आहे. मणिपूरमध्ये 1 जूनपर्यंतच्या वास्तव्यादरम्यान गृहमंत्री सुरक्षा बैठकांच्या अनेक फेऱ्या घेतील. यासोबतच शांतता प्रस्थापित करण्याबाबत शाह विविध लोकांशी चर्चा करणार आहेत.

मणिपूर पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांची हत्या : भाजप आमदाराच्या घराची तोडफोड तसेच मणिपूर रायफल्स, आयआरबीच्या शस्त्रागारातून जमावाने कथित एक हजाराहून अधिक शस्त्रे, दारूगोळा लुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. राज्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यात पहिल्या दिवशी शाह यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

  • Hearty welcome to Imphal Shri @AmitShah Ji, Hon’ble Union Home Minister. Your presence in Manipur has tremendously boost the confidence of the people to restore peace in the state.

    Hon’ble Union HM Shri Amit Shah Ji will hold a series of meetings with various stakeholders of… pic.twitter.com/sqEpRgsSOU

    — N.Biren Singh (@NBirenSingh) May 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

200 घरे जाळली : सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम इंफाळच्या कडंगबंद, सिंगडा भागात संशयित कुकी दहशतवादी, सुरक्षा कर्मचारी यांच्यात भीषण चकमक सुरू आहे. मणिपूरच्या पायथ्याशी नागरिकांवर हल्ले करण्याबरोबरच, शनिवारी रात्री उशिरा काकचिंग जिल्ह्यातील सुगनूजवळील तीन गावांमध्ये अतिरेक्यांनी 200 हून अधिक घरे जाळल्याची घटना घडली आहे.

राज्यात इंटरनेट सेवा बंद : मणिपूरमध्ये सध्या इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. मणिपूरच्या 38 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल आधीच तैनात करण्यात आले आहेत, तर गेल्या दोन दिवसांत लष्कराने 21 अतिरेक्यांना अटक केली आहे. शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा दलांनी आतापर्यंत 40 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 3 मेपासून राज्यात हिंसाचार सुरू आहे.

राज्याच्या विविध भागात मदत शिबिरे : मणिपूरमधील हिंसाचारानंतर राज्याच्या विविध भागात मदत शिबिरे उघडण्यात आली. मणिपूर हिंसाचारात 75 लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत, तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. त्यांच्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, चकमकींमध्ये एकूण 60 लोक मारले गेले. बाकीच्यांवर नंतरच्या दहशतवाद्यांनी हल्ले केले असून 231 जण जखमी झाले आहेत. लष्कर, आसाम रायफल्स आणि सुरक्षा दलांनी हिंसाचारग्रस्त भागातील 35 हजाराहून अधिक लोकांना वाचवले आहे.

हेही वाचाव -

Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा- मल्लिकार्जुन खर्गे यांची राष्ट्रपतींकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.