ETV Bharat / bharat

सत्ताधारी पक्षाला शरम आली पाहिजे: नुपूर शर्मा विरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 1, 2022, 4:05 PM IST

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "भाजप सांप्रदायिक भावना भडकावून फायदा मिळवू पाहत आहे, हे गुपित नाही. आज सर्वोच्च न्यायालयाने या विध्वंसक फूट पाडणाऱ्या विचारसरणींशी लढा देणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकाचा संकल्प मजबूत केला आहे." सत्ताधारी पक्षाने मान शरमेने खाली घातली पाहिजे असेच कोर्टाचे निरीक्षण आहे.

सत्ताधारी पक्षाला शरम आली पाहिजे
सत्ताधारी पक्षाला शरम आली पाहिजे

नवी दिल्ली: काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाने निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबर यांच्या विरोधातील टिप्पणीवर निरीक्षण नोंदवले. "देशभरातील भावना भडकवण्यास त्या एकट्याच जबाबदार" असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. ते योग्यच आहे आणि सत्ताधारी पक्षाला त्याची लाज वाटली पाहिजे अशी काँग्रेसची प्रतिक्रिया आहे.

रमेश यांची तीव्र प्रतिक्रिया - शर्मा विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणानंतर एका निवेदनात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, न्यायालयाने “विध्वंसक फूट पाडणार्‍या विचारसरणी” विरुद्ध लढण्याचा पक्षाचा संकल्प अधिक बळकट केला आहे. रमेश म्हणाले, "देशभरातील भावना भडकवण्यास एकट्याने जबाबदार असल्याबद्दल न्यायालयाने भाजपच्या प्रवक्त्याला अतिशय योग्यरित्या खडसावले आहे. तिने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे," असे रमेश म्हणाले. "सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपण्णीने, सत्तेत असलेल्या पक्षाला शरमेने मान खाली घालावी लागेल," असेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात "विचलित करणाऱ्या" टिप्पणीबद्दल शर्मा यांना फटकारले आणि म्हटले की यामुळे दुर्दैवी घटना घडल्या आणि देशभरात भावना भडकल्या.

वाद कुठे सुरू झाला - एका टीव्ही वादविवादादरम्यान शर्मा यांनी पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीमुळे देशभरात निदर्शने झाली. अनेक आखाती देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. रमेश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला आरसा दाखवला आहे.

धार्मिक भावना भडकवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न - "भाजप सांप्रदायिक भावनांना भडकावून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे हे आता गुपित राहिले नाही. आज सर्वोच्च न्यायालयाने या विध्वंसक फूट पाडणार्‍या विचारसरणींशी लढा देणार्‍या प्रत्येकाचा संकल्प मजबूत केला आहे," असे काँग्रेस नेते म्हणाले. रमेश म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय फायद्यासाठी देशाला अराजकतेत बुडविणाऱ्या सर्व प्रकारच्या "ध्रुवीकरण करणाऱ्या देशविरोधी शक्तींविरुद्ध" आपला लढा कधीही थांबवणार नाही. त्यांच्या "विकृत कृती" चे परिणाम सर्व भारतीय नागरिकांना भोगावे लागतील.

हेही वाचा - Pregnant Woman: कापडाची झोळी करून गर्भवतीने नेले रुग्णालयात;व्हिडीओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.