ETV Bharat / bharat

खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; सणासुदीत तेलाचे भाव होतील कमी?

author img

By

Published : Oct 11, 2021, 4:03 PM IST

Updated : Oct 11, 2021, 4:29 PM IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य नागरिक त्रासले असताना आता खाद्य तेलाच्या वाढत्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलांचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने देशांतर्गत बाजारात खाद्यतेल व्यापाऱ्यांना 31 मार्च 2022 पर्यंत तेलाचा साठा करण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.

Restrictions on storage of edible oil by central government
खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; सणासुदीत तेलाचे भाव होतील कमी?

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य नागरिक त्रासले असताना आता खाद्य तेलाच्या वाढत्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलांचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने देशांतर्गत बाजारात खाद्यतेल व्यापाऱ्यांना 31 मार्च 2022 पर्यंत तेलाचा साठा करण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.

Restrictions on storage of edible oil by central government
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे ट्वीट

व्यापाऱ्यांकडील खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध -

गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किमती या देशातील खाद्य तेलाच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाने सांगितले होते. यावर आता केंद्र सरकारने देशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडील खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध लादल्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्बधांमुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये खाद्यतेलाच्या किमती कमी होणार असल्याचेही केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसे निर्देशही सर्व राज्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ -

दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. अशीच भाववाढ महाराष्ट्रातही दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी खाद्य तेलांच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने त्यात लक्ष घातल्याने दर कमी झाले. पण हा दिलासा काही दिवसांसाठीच राहिला. आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडतील असे चित्र उभे राहिले आहे.

...तरच तेलाचे भाव कमी होतील! -

लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादन कमी झाले होते, तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. एकिकडे पुरवठा कमी झाला असताना मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने आता आयातीवरील कर कमी केले तरच तेलाचे भाव कमी होतील.

हेही वाचा - महाराष्ट्र बंद : शिवसेनेच्या सहभागाने मुंबईत भाजपाच्या गडातही बंद यशस्वी

Last Updated :Oct 11, 2021, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.