ETV Bharat / bharat

Dhankhar Vs Kharge : पंतप्रधानांना माझ्या संरक्षणाची गरज नाही - खर्गेंच्या आरोपावर धनखर यांनी सुनावले

author img

By

Published : Aug 3, 2023, 1:05 PM IST

राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करत आहात असा थेट आरोप केला. यावर उत्तर देताना धनखर यांनी पंतप्रधानांना माझ्या संरक्षणाची गरज नाही. मी तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आलो आहे असे सुनावले ही चर्चा चांगलीच रंगली.(Dhankhar Vs Kharge )

Vice President Jagdeep Dhankhar
उपराष्ट्रपती जगदीप धनखर

नवी दिल्ली: राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात गुरुवारी मणिपूर वरील चर्चे दरम्यान शाब्दिक चकमक उडाली. खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या टिप्पणी नंतर धनखर चांगलेच संतापले. खर्गे यांनी विरोधकांच्या मागणीवर सभापती पंतप्रधानांचा बचाव का करत आहेत असा सवाल केला. धनकर म्हणाले की सरकार मणिपूरवर चर्चेसाठी सहमत आहे. ते म्हणाले की त्यांना 39 नोटिसा मिळाल्या होत्या. नियम 267 अन्वये आणि वरच्या सभागृहातील 37 सदस्यांनी मणिपूरमधील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

धनखर पुढे म्हणाले की मी केवळ सुशासनाशी संबंधित आहे आणि कोणत्याही राजकीय हेतूने मार्गदर्शन करत नाहीत. ना मी राजकारण करतो आणि मला सेवा करण्याचा कोणताही राजकीय स्वार्थ नाही. मला येथे एक महत्वाचे घटनात्मक कर्तव्य सोपवण्यात आले आहे, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनीही कोणत्याही राजकारणाला वरचढ ठरू देऊ नये आणि केवळ देशहिताला प्राधान्य दिले पाहिजे.

आपला देश अनेक क्षेत्रांत पुढे जात आहे, मग तो शासकीय पातळीवर असो किंवा मग अन्य कोणत्याही क्षेत्रात. भारतदेश अर्थव्यवस्था, परराष्ट्र संबंध आणि अंतराळ विज्ञानात मोठी प्रगती करत आहे. या उपलब्धी कमी नाहीत आणि कोणीही या बदलांना कमी लेखू शकत नाही. विरोधी पक्षांची मोठी भूमिका आहे. लोकशाही चैतन्यशील ठेवण्यासाठी आणि सरकारला त्याच्या कर्तव्यात मदत करण्यासाठी भूमिका बजावणे. हे त्यांचे काम आहे.

दुर्दैव आहे की विरोधी पक्ष भारताच्या विकासाच्या प्रवासाचा भाग आहे असे वाटत नाही. सभागृहे चालू न देणे तेथे घोषनाबाजी आणि गोंधळ करणे हे अप्रिय कृत्य आहे. लक्षात ठेवा तुमची प्रत्येक कृती मग ती जबाबदार असो किंवा बेजबाबदार असो त्याचा परिणाम सरकारवर होतो. सरकारचे कामकाज. प्रत्येक चांगल्या आणि वाईटासाठीही तुम्ही सर्व जबाबदार आहात असेही धनखर यांनी सुनावले.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.