ETV Bharat / bharat

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात सर्वात कमी वयाचे शहीद जवान, 'असा' होता मनजीत सिंग यांचा पराक्रम

author img

By

Published : Jul 26, 2022, 6:55 AM IST

Updated : Jul 26, 2022, 7:32 AM IST

Kargil Vijay Diwas : मातृभूमीवर शहीद झालेल्यांच्या या उरलेल्या खुणा असणार आहेत. देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या हृदयात हाच भाव असतो. म्हणूनच आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यापासून तो मागे हटत नाही. कारगिल विजय ( Kargil Vijay Diwas ) दिवसाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या देशाच्या वीरांचे स्मरण करण्याची संधी आहे. असाच एक वीर हरियाणाचा मनजीत सिंग आहे जो कारगिलमध्ये सर्वात कमी वयात हा तरुण शहीद झाला आहे.

शहीद तरुण मनजीत सिंग
शहीद तरुण मनजीत सिंग

अंबाला ( चंदीगड ) - देशात आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. कारगिलमध्ये शत्रूंना ( Kargil Vijay Diwas ) यमसदनास पाठविण्यासाठी शेकडो जवानांनी प्राण दिले. कारगिल विजय दिवसानिमित्त, ईटीव्ही इंडिया तुम्हाला अशा शूरवीरांच्या शौर्याची गाथा सांगत आहे. या जवानांनी २६ जुलै १९९९ रोजी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना हाकलून लावले होते.

आज तुम्हाला कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्वात तरुण सैनिक मनजीत सिंगबद्दल ( Youngest Kargil Martyr manjeet singh ) सांगणार आहोत. ज्यांनी वयाच्या अवघ्या साडेअठराव्या वर्षी पाकिस्तानच्या जवानांना धडा शिकविला. शहीद मनजीत सिंग हे अंबाला येथील मुलाना विधानसभेच्या कानसापूर गावचे रहिवासी होते. ते 8 शीख रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. आजही शहीद मनजितसिंग यांचा उल्लेख केला की साऱ्या गावाची छाती अभिमानाने दाटून येते.

10 वी नंतर सैन्यात भरती झाला मनजीत - शहीद मनजीत सिंग ( Youngest Kargil Martyr manjeet singh ) 11वी मध्ये भरती होणार होता. त्याच दरम्यान त्यांना सैन्यात भरतीचे पत्र आले, जे पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या शिक्षकानेही त्याला 11 वीची परीक्षा द्यायला सांगितली, पण त्यांच्यासाठी देशसेवेला प्राधान्य होते. ते परीक्षा सोडून सैन्यात भरती होण्यासाठी गेले

मनजीतला तीन भाऊ - शहीद मनजीत सिंग हे तीन भावांपैकी दुसरे होता. त्यांचा मोठा भाऊही सैन्यात होता. त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. धाकटा मुलगा दुबईत राहतो. मनजीत सिंग यांचे पार्थिव गावात पोहोचला. तेव्हा गावात किती लोक जमा झाले होते हे कळले नाही. त्यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री असलेले बन्सीलाल त्याच्या गावी गेले, त्यांनी त्यांच्या घरापर्यंत रस्ता बांधला आणि गावातील शाळेचे नाव शहीद मनजीत सिंग प्राथमिक माध्यमिक विद्यालय असे ठेवले.

ट्रेनिंग संपताच कारगिल युद्ध सुरू झाले - मनजीत सिंग यांचे प्रशिक्षण अवघ्या काही दिवसांवर आले होते. ट्रेनिंग संपवून कारगिल युद्ध सुरू झाले, तेव्हा ते रजेवरही गेले नव्हते. सर्वात तरुण जवानांपैकी एक असलेल्या मनजीत सिंग यांना कारगिलमध्ये तैनात करण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तैनातीच्या वेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे ६ महिने होते.

टायगर हिलवर कब्जा करताना शहीद - टायगर हिलवर चढताना मनजीतला थोड्याच अंतरावर पाकिस्तानी घुसखोरांचे बंकर दिसले. मनजीतने पुढे जाऊन काही ग्रेनेड आणि एके- 47 च्या मदतीने बंकरवर हल्ला केला. याचा फायदा घेत मागून येणाऱ्या भारतीय तुकडीने घुसखोरांना सावरण्याची संधी दिली नाही आणि बंकरवर ताबा मिळवला. यादरम्यान सैनिकांनी कारगिल जिंकले, पण मनजीत सिंग यांनी देशासाठी प्राण अर्पण केले..

8 मे 1999 रोजी सुरू झालेले कारगिल युद्ध 26 जुलै रोजी संपले. 60 दिवस चाललेल्या या युद्धात भारताला आपल्या अनेक शूर सुपुत्रांना प्राण गमवावे लागले. पण सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूंपुढे भारत मातेचे मस्तक झुकू दिले नाही. कारगिल युद्ध हे भारतीय लष्कराच्या शौर्याचे आणि शौर्याचे असे उदाहरण आहे. ज्याचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त ईटीव्ही भारत त्या सर्व शूरवीरांना प्रणाम करते.

हेही वाचा - प्रत्येक वर्षी २६ जुलै'ची आठवण! मुंबईत तब्बल १४९३ नागरिकांचा झाला होता मृत्यू; वाचा सविस्तर

हेही वाचा - CBI Busts Rajya Sabha Seat Scam : 100 कोटींमध्ये राज्यसभेची जागा; लातूरच्या एकासह सीबीआयने केला टोळीचा पर्दाफाश

हेही वाचा - Ranveer Singh : रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटचं प्रकरण भोवणार?, पोलिसांत तक्रार दाखल

Last Updated :Jul 26, 2022, 7:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.