ETV Bharat / bharat

Maharashtra political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल, 16 आमदार ठरणार का अपात्र?

author img

By

Published : May 10, 2023, 4:07 PM IST

Updated : May 11, 2023, 6:16 AM IST

अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार आहे. याबाबत स्वत: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड घोषणा केली आहे. दरम्यान, या प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असे बोलले जात होते.

Maharashtra political Crisis
Maharashtra political Crisis

नवी दिल्ली : शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षनाव केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी जाहीर केले आहे. उद्या दोन घटनापीठाचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केले. दरम्यान, कोर्टाचे संपूर्ण कामकाज हे लाईव्ह दाखवले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे कामकाज घरबसल्या पाहता येणार आहे.

उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या : सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. दरम्यान, यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी, कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत, असे माहिती सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितली आहे.

ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त : या प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असं बोलले जात होते. गेल्या दोन दिवसांपासून या निकालाच्या चर्चांना जोर आला होता. अखेर, सरन्यायाधीश यांनीच याप्रकरणी खुलासा केला आहे.

  • The Constitution Bench of the Supreme Court is likely to deliver the judgment on the Maharashtra political crisis tomorrow

    CJI DY Chandrachud says we are going to be delivering two judgments tomorrow. pic.twitter.com/ussIowOaOm

    — ANI (@ANI) May 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अध्यक्ष कोण? : आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधिमंडळातच होईल, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. पण हा निर्णय कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार? विधानसभेचे तत्कालिन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ की सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर? याबाबत सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. यावर उद्या निकालाची शक्यता आहे.

'या' नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार

  • एकनाथ शिंदे
  • अब्दुल सत्तार
  • संदिपान भुमरे
  • संजय शिरसाट
  • तानाजी सावंत
  • यामिनी जाधव
  • चिमणराव पाटील
  • भरत गोगावले
  • लता सोनावणे
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • अनिल बाबर
  • महेश शिंदे
  • संजय रायमुलकर
  • रमेश बोरणारे
  • बालाजी कल्याणकर

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मत काय? : येत्या दोन दिवसात निकाल नाही लागला तर ते लोकशाहीसाठी काळा दिवस असेल. अक्षम्य गोष्ट सुप्रीम कोर्टकडून होईल. रकार घटनाबाह्य आहे की नाही, हे दोन महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने ठरवायला हवे होते. उध्दव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत, असे उल्हास बापट म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही राजीनामा देऊ शकतात. सुप्रीम कोर्ट अपत्रातेचा निर्णय घेणार नाही. ते विधासनभा अध्यक्षांकडे पाठवतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल विधानसभा अध्यक्षावर बंधनकारक असेल, असे उल्हास बापट यांनी सांगितले आहे.

उज्वल निकम म्हणतात : कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केले आहे. दोन दिवसात हा निकाल येऊ शकतो, असे उज्वल निकम म्हणाले आहेत. या दोन दिवसात निकाल न आल्यास निवृत्त न्यायाधिशांच्या जागी नवे न्यायाधिश असतील. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी 8 ते 9 याचिकांवर सुनावणी होते. त्याचा निकाल लवकरच लागेल, असे निकम म्हणाले आहेत.

असीम सरोदे यांची प्रतिक्रिया : कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 11 किंवा 12 मेला शिवसेनेतील पेच सुटण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. सत्तासंघर्षाचा प्रश्न न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्याची जास्त शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे, असे असीम सरोदे म्हणाले आहेत.

Last Updated :May 11, 2023, 6:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.