ETV Bharat / bharat

Shahjahanpur Accident : ट्रॉली चालकांनी लावली एकमेकांशी शर्यत अन् झाला अपघात; 21 लोकांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 15, 2023, 4:43 PM IST

Updated : Apr 15, 2023, 4:58 PM IST

उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Shahjahanpur Accident
शाहजहानपूर अपघात

शहाजहानपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यात आज एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे ट्रॅक्टर ट्रॉली पुलाचे रेलिंग तुटून खाली पडली. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त : मिळालेल्या माहितीनुसार, तिलहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरसिंग गावाजवळ हा अपघात झाला. येथे लोक गर्रा नदीचे पाणी घेऊन जात होते. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

  • #UPCM @myogiadityanath ने जनपद कन्नौज में हुए सड़क हादसे में हुई जनहानि पर गहरा दुःख प्रकट किया है। मुख्यमंत्री जी ने दिवंगत आत्मा की शांति की कामना करते हुए शोक संतप्त परिजनों के प्रति संवेदना व्यक्त की है।

    मुख्यमंत्री जी ने घायलों को तत्काल अस्पताल पहुंचाकर जिला प्रशासन के…

    — CM Office, GoUP (@CMOfficeUP) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बचाव पथक घटनास्थळी दाखल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच त्यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्यात गुंतले आहेत. सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ट्रॉली चालकांनी एकमेकांशी शर्यत लावली होती : एसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, आझमपूर गावात भागवत कथेसाठी लोक गर्रा नदीतून पाणी घेण्यासाठी आले होते. गावातील लोक दोन ट्रॉलीतून जात होते. नदीचे पाणी घेतल्यानंतर ते ट्रॉलीमध्ये बसून गावाकडे परतत होते. दरम्यान, ट्रॉलीच्या चालकांनी एकमेकांशी शर्यत लावली. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका ट्रॉलीचा तोल गेला आणि ती पुलाचे रेलिंग तोडून गर्रा नदीत पडली. या ट्रॉलीमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुले असे सुमारे 42 जण बसले होते. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देऊन बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच कोतवाली प्रभारी राजकुमार शर्माही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून सीएचसीमध्ये पाठवले.

हे ही वाचा : Raigad Bus Accident : रायगड बस अपघातावर अमित शाहांचे ट्विट, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त; CM, DCM यांच्याकडून घेतली माहिती

Last Updated : Apr 15, 2023, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.