ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश : आग लागल्याने पाच घरे जळून खाक

author img

By

Published : Feb 26, 2021, 4:41 AM IST

शिमल्याजवळील एका गावात आग लागल्याने पाच घरे जळून खाक झाली असून बारा घरांना याची झळ पोहोचली आहे.

आग
आग

शिमला (हिमाचल प्रदेश) - शिमलाजवळील ननखडी अड्डू पंचायतीतील पाच घरे जळून खाक झाली आहेत. याच कोट्यवधींचे नुकसान झाले असून पाच परिवार यामुळे बेघर झाले आहेत.

घटनास्थळ

ही घटना गुरुवारी (दि. 25) रात्री घडली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, आसपास लाकडांची घरे असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले.

सुमारे दीड कोटीचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 12 घऱांना या आगीची झळ पोहोचली अशून तब्बल दीड कोटींचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - मच्छिमारांसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाची गरज - राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.