ETV Bharat / bharat

Farmers Ruckus In Buxar : बक्सरमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांची गाडी पेटवली

author img

By

Published : Jan 11, 2023, 7:40 PM IST

Farmers Ruckus In Buxar
बक्सरमधील शेतकरी आंदोलन

बक्सरमधील चौसा थर्मल पॉवर प्लांटने संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. ग्रामस्थांनी पोलिस आणि वीज केंद्रावर लाठीहल्ला करत पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली.

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

बक्सर (बिहार) : बिहारच्या बक्सरमधील चौसा ब्लॉक बनारपूर येथील शेतकरी स्थानिक पोलिसांच्या क्रूरतेमुळे संतापले आहेत. भरपाईच्या मागणीसाठी पोलिसांनी काल रात्री 12 वाजता आंदोलक शेतकऱ्यांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण केली होती. यानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी संतप्त पवित्रा घेत पोलिस वाहनासह एसजेव्हीएनचे गेट पेटवून दिले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत सुमारे 6 राऊंड गोळीबार केला. आता संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू आहे.

शेतकर्‍यांची मागणी काय आहे? : शेतकर्‍यांनी सांगितले की त्यांची जमीन औष्णिक वीज प्रकल्पाच्या जमिनीच्या वादासाठी चौसा येथील एसजेव्हीएनने 2010-11 पूर्वीच संपादित केली होती. त्यावेळी त्यांना 2010-11 नुसार नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा शेतकऱ्यांनी चालू दरानुसार जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली. तो मोबदला देण्यास कंपनी तयार नाही. याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलकांच्या घरात घुसून महिला, पुरुष आणि लहान मुलांवर लाठीमार केला. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

शेतकऱ्यांशी मारपीटीचा व्हिडीओ आला समोर : पोलिसांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या घरात घुसून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शेतकऱ्यांचा संताप उसळला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ पीडितेच्या कुटुंबीयांनी मीडियासोबत शेअर केला आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना वेठीस धरल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत होते पण पोलिसांना त्यांचे काही एक ऐकले नाही.

पीडिताची प्रतिक्रिया : या घटनेवर एका पीडिताने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, 'आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून भूसंपादनासाठी सध्याच्या दरानुसार योग्य मोबदला देण्याची मागणी करत आहोत. परंतु कंपनी जुन्या दराने भरपाई देऊन जबरदस्तीने जमीन संपादित करत आहे. आमचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिस आम्हाला मारहाण करत आहेत. घरात आमची लहान मुलेही होती. शेवटी पोलिसांनी आम्हाला एवढ्या निर्दयीपणे मारहाण केली यात आमचा काय दोष आहे'.

हे ही वाचा : Katihar Road Accident : भरधाव ट्रकची ऑटोला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.