ETV Bharat / bharat

हिंसा अन् द्वेषाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकता, पण देशासाठी काहीही करता येत नाही -राहुल गांधी

author img

By

Published : Sep 12, 2022, 9:49 PM IST

आपण हिंसा आणि द्वेषाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकतो पण हिंसाचार आणि द्वेषाच्या जोरावर देशासाठी काहीही करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. (Bharat Jodo Yatra) ते म्हणाले की या देशातील प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे आणि जर कोणी इतर भारतीयांचा द्वेष करत असेल तर तो भारताच्या कल्पनेचा तिरस्कार करतो. विशिष्ट विचारसरणीतून जन्माला आलेले राग आणि द्वेषाचे वातावरण आज आपल्याकडे आहे.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

तिरुअनंतपुरम (केरळ) - आपण हिंसा आणि द्वेषाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकतो पण हिंसाचार आणि द्वेषाच्या जोरावर देशासाठी काहीही करू शकत नाही, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या देशातील प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे आणि जर कोणी इतर भारतीयांचा द्वेष करत असेल तर तो भारताच्या कल्पनेचा तिरस्कार करतो. विशिष्ट विचारसरणीतून जन्माला आलेले राग आणि द्वेषाचे वातावरण आज आपल्याकडे आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

राहुल गांधी पुढे म्हणाले की, काही लोकांनी भारते जोडोबद्दल विचारले आहे, तर यामध्ये अनेक महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. आपल्याला लाखो गरीबांचे दुःख कमी करायचे आहे. हे करणे सोपे नसले तरी ते करावे लागेल असही ते म्हणाले आहेत.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

लोकांना संबोधित करताना राहुल म्हणाले की, केरळच्या लोकांनी एकत्र उभे राहणे, सामंजस्याने काम करणे हे अतिशय स्वाभाविक आणि सामान्य आहे. तसेच, तुम्ही हे बाकीच्या देशाला दाखवून दिले आहे.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

काँग्रेसची भारत जोडो यात्रा १९ दिवसांत केरळचे संपूर्ण अंतर कापणार आहे. आजच्या दौऱ्यात राहुल यांनी वाटेत स्वागतासाठी उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला. यादरम्यान ते मुलांसोबत भेटताना, खेळताना आणि लाड करताना दिसले. त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

या प्रवासादरम्यानचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत त्यांनी लिहिले की, हे अंतर कापताना सर्वांमध्ये आपुलकी आणि प्रेम दिसत आहे.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

तिरुअनंतपुरममध्ये जवाहर बाल मंचच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात राहुल गांधी यांनी विजेत्यांना बक्षीस वितरण करून होतकरू विद्यार्थ्यांची भेट घेतली.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी केरळमधील सर्व स्तरातील प्रभावशाली व्यक्तींची भेट घेतली. देशातून द्वेषाचे उच्चाटन करणे, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

यात्रेसाठी गर्दी जमवण्याचा आमचा कधीच हेतू नव्हता, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. मात्र, आम्ही तिथून जिथे जात होतो, तिथे लोक खूप उत्साहात होते.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

केरळमध्ये काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. स्वागत करणाऱ्या नेत्यांमध्ये पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही होते.

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

काँग्रेस अध्यक्षांच्या स्वागतासाठी स्थानिक नेत्यांशिवाय समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तामिळनाडू सीमेजवळील परसला येथून केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल 19 दिवसांत मलप्पुरम ते निलांबर असा 450 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.