ETV Bharat / bharat

'त्या' वादग्रस्त पोस्ट प्रकरणी कंगना रणौतविरोधात गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तक्रार दाखल

author img

By

Published : Nov 21, 2021, 10:19 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वादग्रस्त असलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Law) रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर शेतकरी कायद्यावरून वादग्रस्त टिप्पणी केली आहे. यावरून तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Delhi Sikh Gurdwara Management Committee president lodges complaint against Kangana Ranaut
'त्या' वादग्रस्त पोस्ट प्रकरणी कंगना रणौतविरोधात गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तक्रार दाखल

नवी दिल्ली - अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut)अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शीख संघटनेने कंगना रणौतवर गुन्हा दाखल केला आहे. गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (DSGPC) दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनच्या सायबर सेलमध्ये कंगनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती.

कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर ही वादग्रस्त टिप्पणी केली आहे. कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने लिहिले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी या खलिस्तानींना डासाप्रमाणे चिरडले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या प्राणाची किंमत मोजली पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. आजही त्यांच्या नावाने हे खालिस्तानी थरथर कापतात, त्यांना तशाच गुरूची गरज आहे. तसेच शुक्रवारी कायदे रद्द झाल्यानंतर ती म्हणाली होती की, "दुःखद आणि लज्जास्पद ...संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या ऐवजी रस्त्यावरील लोक जर कायदे करु लागले तर ते राष्ट्र जिहादी आहे. ज्यांना जे पाहिजे होते त्यांना ते मिळाले त्यांचे अभिनंदन."

कंगना राणौतच्या या वक्तव्यानंतर शीख समुदायात संतापाची लाट पसरली आहे. कंगना रणौत पद्मश्री पुरस्कारला पात्र नाही. कंगनाला मानसिक रुग्णालयात दाखल करावे किंवा तुरुंगात पाठवावे. कंगना जाणूनबुजून शिखांचा अपमान करण्यासाठी अशी टिप्पणी करत असते, असे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले.

शेतकरी कायदे रद्द झाल्याने कंगना नाराज -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वादग्रस्त असलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Law) रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचा विरोध होत असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना या कायद्याबद्दल समजून सांगण्यात कमी पडलो, त्या बद्दल देशाची माफी मागतो.

कृषी कायद्याच्या विरोधात कंगना रणौत सुरुवातीपासून राहिली आहे. या आंदोलनातील शेतकऱ्यांबाबत तिने अनेक मुद्दे सोशल मीडियातून व्याक्त केले होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या रोषालाही ती सामोरी गेली होती. शेतकी आंदोलक नकली असल्याची ती सतत म्हणत होती. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघार घेतल्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ असलेल्या व शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्या कंगनासारख्यांची गोची झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.