ETV Bharat / bharat

Congress on Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार.. म्हणाले, 'राष्ट्रवादीचा दृष्टिकोन वेगळा, 19 विरोधी पक्षांसाठी गंभीर मुद्दा'

author img

By

Published : Apr 8, 2023, 11:06 AM IST

CONGRESS COMMENTS ON NCP CHIEF SHARAD PAWAR REMARK ON HINDENBURG REPORT CONCERNING ADANI GROUP
शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार.. म्हणाले, 'राष्ट्रवादीचा दृष्टिकोन वेगळा, 19 विरोधी पक्षांसाठी गंभीर मुद्दा'

हिंडेनबर्ग अहवालावर शरद पवारांच्या टिप्पणीवर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, हा राष्ट्रवादीचा दृष्टिकोन आहे, पण अदानी समूहाचा मुद्दा गंभीर असल्याचे 19 विरोधी पक्षांचे मत आहे.

नवी दिल्ली : अदानी समूहातील वाद आणि हिंडेनबर्ग अहवालावर शरद पवारांच्या टिप्पणीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश यांनी शुक्रवारी सांगितले की, या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे मत वेगळे असू शकते, परंतु 19 विरोधी पक्षांना अदानी समूहाचा मुद्दा गंभीर असल्याची खात्री आहे. जयराम रमेश म्हणाले की, मतभेद असले तरी २० समविचारी विरोधी पक्ष एकत्र आहेत आणि भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र लढतील.

त्याचवेळी जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतःचे मत असू शकते परंतु 19 समविचारी विरोधी पक्षांना खात्री आहे की पंतप्रधानांशी संबंधित अदानी समूहाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. पवार म्हणाले होते की, सध्याच्या परिस्तितीमध्ये संसदेत सत्ताधारी पक्ष भाजपचे बहुमत आहे. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली असताना जेपीसीची (तपास) गरज नाही, असे पवार म्हणाले.

मुलाखतीत काय म्हणाले होते पवार: राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी एका टीव्ही मुलाखतीत म्हटले होते की, ते अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाला लक्ष्य केल्याप्रमाणे मानतात आणि या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्यास ते सहमत नाहीत. कोणीतरी विधान करून देशात खळबळ उडवून दिली, असे शरद पवार म्हणाले होते. यापूर्वीही अशी विधाने करण्यात आली होती, त्यावरून गदारोळ झाला होता, मात्र यावेळी या विषयाला दिलेले महत्त्व प्रमाणाबाहेर गेले, असेही ते म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाची चौकशी चांगला मार्ग: माझ्या पक्षाने जेपीसीला पाठिंबा दिला आहे, परंतु मला वाटते की जेपीसीवर सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असल्याने त्यातून सत्य बाहेर येणार नाही. त्यामुळे मला वाटते की सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेले पॅनेल सत्य बाहेर आणण्याचा एक चांगला मार्ग आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा: अजित पवार होते संपर्काच्या बाहेर, उडाली होती खळबळ, समोर आले अन् म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.