Rishabh Pant Accident: क्रिकेटर ऋषभ पंतचा जिथे झाला होता अपघात, त्याठिकाणी होणार मोठे बदल.. कारवाई सुरु

author img

By

Published : Jan 21, 2023, 6:31 PM IST

Rishabh Pant Accident: THE CANAL WILL BE SHIFTED FROM THE SPOT WHERE CRICKETER RISHABH PANT CAR ACCIDENT HAPPEN IN ROORKEE
क्रिकेटर ऋषभ पंतचा जिथे झाला होता अपघात, त्याठिकाणी होणार मोठे बदल.. कारवाई सुरु ()

टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला उत्तराखंडच्या रुरकीमध्ये अपघात झाला होता. या अपघाताला रस्त्याच्या काठावर असलेला एक कालवा कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. ईटीव्ही भारतने ही बातमी दाखवल्यानंतर आता एनएचएआय आणि पाटबंधारे विभागाकडून रस्त्याच्या काठावर बांधलेला कालवा अन्य ठिकाणी हलवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

क्रिकेटर ऋषभ पंतचा जिथे झाला होता अपघात, त्याठिकाणी होणार मोठे बदल.. कारवाई सुरु

डेहराडून (उत्तराखंड): भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याचा रुरकीमध्ये अपघात झाला होता. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या मोठ्या भागातून पाटबंधारे विभागाचा कालवा जात होता. रस्ता अपघातानंतर अनेकजण या अपघाताची कारणे सांगत असताना, अतिवेग, झोपेची डुलकी, खड्डे आणि अनेक कारणं सांगण्यात आले. त्यानंतर ईटीव्ही भारतने सांगितले होते की, अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणापासून 10 पावले दूर राष्ट्रीय महामार्गाजवळून जाणारा कालवा आहे.

यापूर्वी झाले आहेत डझनभर अपघात: ईटीव्ही भारतने त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता की, या ठिकाणी हा पहिलाच रस्ता अपघात नाही, तर याआधीही या ठिकाणी डझनभर रस्ते अपघात झाले आहेत. ऋषभ पंतच्या रस्ता अपघातानंतर NHAI आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून येत असताना ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर डेहराडूनमध्ये उपचार करण्यात आले आणि आता त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिथे त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.

ग्रामस्थांनी अनेकदा केले आहे आंदोलन: हरिद्वार-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड बंद होण्यामागे आणि राष्ट्रीय महामार्गावर माती साठण्यामागे हा कालवा कसा कारणीभूत आहे हे आम्ही सांगितले होते. अपघातस्थळी असलेल्या कालव्याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली आहेत. दिल्लीकडून येणाऱ्या कोणत्याही वाहनाचा वेग ७० च्या वर असेल आणि ते वाहन कालव्याजवळ थोडेसेही जोरात आले तर अपघात होण्याची शक्यता आहे.

असा झाला ऋषभ पंतचा अपघात: अपघातावेळी ऋषभ पंतची गाडी वेगात होती आणि समोरून नॅशनल हायवेच्या बाजूला कॅनॉलचा एक भाग असल्याचे त्याला अचानकपणे दिसले. त्यानंतर त्याने गाडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि टायर खड्ड्यात गेल्याने रस्ता अपघात झाला. या रस्ते अपघाताची चौकशी सुरू असली तरी या संपूर्ण परिसरासाठी आनंदाची बाब म्हणजे आता या कालव्याच्या स्थलांतराचे काम सुरू झाले आहे.

लक्ष दिले नाही : काम सुरू होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने एनएचएआयला पत्र लिहून पुढील १५ दिवस कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले. त्यानंतर NHAI आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून काम करत आहेत. पंत यांच्या अपघातानंतर दोन्ही खात्यांनी आणि विशेषत: पाटबंधारे खात्याने ज्या पद्धतीने कारवाई केली, त्यावरून हा मोठा निष्काळजीपणा पाहूनही हा विभाग बराच वेळ गप्प बसल्याचे स्पष्ट होते. आता रस्त्यावर येणारा हा कालवा सुमारे 4.5 मीटर दुसऱ्या दिशेने वळवला जात आहे.

रस्त्याचे रुंदीकरण होणार : एनएचएआयने वर्षांपूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग बांधला होता, त्यावेळीही पाटबंधारे विभागाला पत्रे लिहिली होती. जेणेकरून सर्व्हिस रोड व हायवे व्यवस्थित बांधता येतील, मात्र त्यावेळीही पाटबंधारे विभागाने नकार दिल्याचे बोलले जात आहे. NHAI DGM राघव मिश्रा सांगतात की, या कालव्यामुळे रस्त्याच्या मोठ्या भागाचे रुंदीकरण होत नव्हते. आता कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर सर्व्हिस रोड आणि हायवेमध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. कारण पाणी जास्त काळ थांबवता येत नाही.

हेही वाचा: Rishabh Pant Health Update ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता मैदानात होणार वापसी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.