ETV Bharat / bharat

सलग सातव्यांदा विजय मिळवत भाजपची पश्चिम बंगालच्या डाव्या आघाडी सोबत बरोबरी

author img

By

Published : Dec 8, 2022, 5:38 PM IST

पश्चिम बंगालशी भाजपची बरोबरी
BJP Equal with West Bengal

गुजरातमधील दणदणीत विजयासह, भाजपने केवळ सलग सातव्यांदा विजय ( for the seventh time winning the left front) मिळवण्याच्या डाव्या आघाडीच्या (BJP Equal with West Bengal) विक्रमाची बरोबरी केली. सोबतच हा कार्यकाळ पूर्ण केला तर सर्वाधिक काळ सत्तेत राहणारा राजकीय पक्ष (party has been in power for the longest time) बनेल.

हैदराबाद: गुजरातमधील दणदणीत विजयासह, (A resounding victory in Gujarat) भाजपने सलग सातव्यांदा विजय मिळवण्याच्या डाव्या आघाडीच्या विक्रमाची बरोबरी तर केलीच पण कार्यकाळ पूर्ण केल्यास सशर्त सर्वाधिक काळ सत्तेत राहणारा राजकीय पक्ष बनेल. 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली आणि तेव्हापासून गेली 27 वर्षे जनतेचा जनादेश सांभाळत आहे. 2022 मधील विजय हा केवळ भाजपचा विजय आहे, ज्याने पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या विक्रमाची बरोबरी करत सलग सातव्यांदा विजय मिळवला आहे,

भाजपने त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तरीही, पक्षाला 32 वर्षे राज्य करण्याचे श्रेय मिळेल. पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य करणाऱ्या डाव्या आघाडीपेक्षा दोन वर्षे कमी आहेत. १९७७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आले आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर येईपर्यंत ३४ वर्षे राज्य केले. केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर त्रिपुरामध्येही माणिक बॅनर्जी मुख्यमंत्री असताना डाव्या आघाडीने १९ वर्षे राज्य केले. एवढेच नाही तर मोदी आणि त्यांच्या टिमने राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून विक्रम केला आहे.

1985 मध्ये माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या, जे आतापर्यंत राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने मिळविलेल्या सर्वाधिक जागा होत्या. भाजपने आतापर्यंत 156 जागा जिंकल्या आहेत. भाजपने गाठलेला हा टप्पा राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने कमावलेल्या विजया पेक्षा सर्वात मोठा विजय ठरेल. पवन कुमार चामलिंग मुख्यमंत्री म्हणून सिक्कीम लोकशाही आघाडीने 24 राज्य केले आणि त्यानंतर ओडिशाचे नवीन पटनायक हे सलग पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेगॉन्ग अपांग यांनी अरुणाचल प्रदेशवर 22 वर्षांहून अधिक काळ राज्य केले आहे, त्यानंतर मिझोरामचे लाल थनहवला आणि हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह यांनी राज्य केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.