ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : चकमकीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोध कार्य सुरू

author img

By

Published : Jun 30, 2020, 10:01 AM IST

Updated : Jun 30, 2020, 10:51 AM IST

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील वाघामा परिसात सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) - जिल्ह्यातील वाघामा परिसरात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आणखी काही दहशतवादी असल्याचा सुरक्षा दलाला शंका असल्याने आसपासच्या परिसरात शोध मोहिस सुरु करण्यात आली आहे.

परिस्थितीचा आढावा घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

याबाबत जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक जवान और पाच वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना या चकमकीत ठार केले आहे.

सोमवारीही (दि. 29 जून) अनंतनाग जिल्ह्याच्या के खुलचोहर परिसरात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ज्यात अनंतनाग जिल्ह्यातील हिज्बुल कमांडर व एक लष्कर-ए-तैयबाच्या कमांडराचा समावेश होता.

यापूर्वीही 26 जून रोजी पुलवामा जिल्हातील त्रालजवळील चेवा उल्लार परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यानंतर त्राल क्षेत्रातील हिजबुल मुजाहिद्दीनचा सफाया झाला होता. 1989नंतर पहिल्यांदाच असे झाले आहे. ही जून महिन्यातील दक्षिण काश्मीरमध्ये 12वी चकमक होती. आतापर्यंत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 33 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.

हेही वाचा - गिलानी आणि काश्मीरमधले फुटीरतावादी राजकारण..

Last Updated :Jun 30, 2020, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.