ETV Bharat / bharat

बिथरलेल्या पाकिस्तानचा समुद्रमार्गे भारतावर हल्ल्याचा कट; कांडला बंदराची सुरक्षा वाढवली

author img

By

Published : Aug 29, 2019, 3:24 PM IST

Updated : Aug 30, 2019, 9:23 AM IST

पाकिस्तानी लष्कर समुद्रामार्गे गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील कांडला बंदराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कांडला बंदर

नवी दिल्ली - भारताविरोधात आवाज उठवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्याने पाकिस्तानी लष्कर समुद्रामार्गे गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्याने देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घुसखोरीद्वारे देशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट असल्याची माहिती मिळल्याने गुजरातमधील कांडला बंदराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कांडला बंदराची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सर क्रिक खाडीमधून पाकिस्तानचे विशेष कमांडो लहान बोटींद्वारे भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच गुजरातमधील कच्छ भागातून देशात घुसखोरी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी; काश्मीर मुद्द्यावर शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. मात्र, काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा असून, पाकिस्तानने देशांतर्गत मुद्द्यांवर टिप्पणी करणे थांबवावे, असे भारताने स्पष्ट केले आहे.

५ ऑगस्टला भारताने काश्मीरची स्वायतत्ता रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated :Aug 30, 2019, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.