ETV Bharat / bharat

Nirbhaya case : निर्भया प्रकरणाला दहा वर्षे पूर्ण ; समाजाची मानसिकता मात्र कायम

author img

By

Published : Dec 16, 2022, 2:06 PM IST

16 डिसेंबर 2022 म्हणजे आज निर्भया प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण ( Nirbhaya case completes ten years ) झाली. या दु:खद घटनेने संपूर्ण देश हादरला. निर्भया प्रकरणात २०२० मध्ये पीडित कुटुंबाला न्याय मिळाला. पण या सगळ्यात खेदाची बाब म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा होऊनही अशा घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. ( Nirbhaya Case Know Case History )

Nirbhaya case
निर्भया प्रकरण

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहे. ( Nirbhaya case completes ten years ) याच दिवशी निर्भया बसमध्ये प्रवास करणाऱ्या तरूणांची शिकार झाली. हे असे प्रकरण होते ज्याने केवळ पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीच बदलल्या नाहीत तर फॉरेन्सिक पुराव्याचा अशा प्रकारे वापर केला की गुन्हेगारांना फासावर नेण्याचे ते उदाहरण ठरले. दुसरीकडे, निर्भया प्रकरण हे जगातील पहिलेच प्रकरण होते ज्यात शब्दांऐवजी हावभावाने 164 चे जबाब नोंदवले गेले आणि त्यावरच संपूर्ण खटला लढला गेला. मात्र एवढे होऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. ( Nirbhaya Case Know Case History )

दोषींना शिक्षा देण्यासाठी 8 वर्षे संघर्ष : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ( NCRB ) च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी दिल्लीत दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला आणि देशभरातील महिलांसाठी दिल्ली हे सर्वात असुरक्षित महानगर राहिले. 2021 मध्ये महिलांवरील 13,893 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2020 मध्ये ही संख्या 9,783 होती. म्हणजेच एकूणच ही प्रकरणे कमी होण्याऐवजी वाढली आहेत.निर्भया प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पीडितेच्या आईने सांगितले की, आपल्या मुलीच्या दोषींना शिक्षा व्हावी यासाठी तिला 8 वर्षे संघर्ष करावा लागला, तेव्हाच तिला न्याय मिळाला. पण आजही बलात्कार प्रकरणातील अशा अनेक माता आणि कुटुंबे आहेत, ज्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी घरोघरी भटकत आहेत.

न्याय व्यवस्था वेगवान असणे आवश्यक : चावला गँगरेप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यावर पीडित कुटुंबाला खूप दुःख झाले. दिल्ली सरकारच्या या निर्णयाच्या पुनर्विलोकन याचिकेला नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्यामुळे कुटुंबाला नवी आशा मिळाली असली, तरी पीडित कुटुंबाला दीर्घ लढा द्यावा लागत आहे. यावर निर्भयाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलींसोबत विनयभंग करणारे किती लोक बाहेर फिरत आहेत, जे समाजासाठी धोक्याचे आहेत, हे माहीत नाही. मात्र दोषींना जी शिक्षा मिळायला हवी, तीच पीडित कुटुंबीयांना मिळत आहे, अशी व्यवस्था झाली आहे. आमच्या लढ्यातही अनेकवेळा फाशी पुढे ढकलण्यात आली आणि न्यायालयातही आम्हाला अनेक पुरावे द्यावे लागले. पोलीस यंत्रणा कठोर असण्याची गरज आहे आणि न्याय व्यवस्था वेगवान असणे आवश्यक आहे.

निर्भया प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण : 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर चालणाऱ्या बसमध्ये सहा नराधमांनी एका पॅरामेडिकल विद्यार्थिनीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या घटनेने केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण जग हादरले. आज निर्भया बलात्कार प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. निर्भया बलात्कार प्रकरणाची संपूर्ण टाइमलाइन जाणून घ्या.

रुग्णालयात निर्भयाचा मृत्यू : 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. 18 डिसेंबर 2012 रोजी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या 4 आरोपींना अटक केली. 21 डिसेंबर 2012 रोजी अल्पवयीन आरोपीला आनंद विहार बसस्थानकावरून पकडण्यात आले. 22 डिसेंबर 2012 ला सहावा आरोपी अक्षय ठाकूरला बिहारमधून अटक केला. 29 डिसेंबर 2012 रोजी उपचारादरम्यान सिंगापूरमधील रुग्णालयात निर्भयाचा मृत्यू झाला. 3 जानेवारी 2013 रोजी पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध खून, सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि दरोडा प्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

चार दोषींना फाशीची शिक्षा : 17 जानेवारी 2013 रोजी जलदगती न्यायालयाने पाच प्रौढ आरोपींवर आरोप निश्चित केले. 11 मार्च 2013 ला आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली.31 ऑक्टोबर 2013 रोजी जुवेनाईल बोर्डाने अल्पवयीन आरोपीला सामूहिक बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवले. 10 सप्टेंबर 2013 रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने चार आरोपी मुकेश, विनय, पवन आणि अक्षय यांना दोषी ठरवले.13 सप्टेंबर 2013 रोजी न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.13 मार्च 2014 ला दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. 15 मार्च 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोषींच्या फाशीला स्थगिती दिली. 20 डिसेंबर 2015 ला अल्पवयीन गुन्हेगाराची बालगृहातून सुटका झाली. 27 मार्च 2016 ला सर्वोच्च न्यायालयाने दोषींच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. 5 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली.9 जुलै 2018 ला पुनर्विलोकन याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली. 7 जानेवारी 2020 रोजी निर्भयाच्या चार दोषींसाठी डेथ वॉरंट जारी. 20 मार्च 2020 रोजी तिहार तुरुंगात चारही दोषींना फाशी देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.