महाराष्ट्र

maharashtra

''केंद्र सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो...'' सर्वसामान्य मुंबईकरांच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 6:33 PM IST

Updated : Feb 1, 2024, 7:19 PM IST

Budget Reaction: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसाठी काय तरतुदी आहेत, याविषयी मुंबईकरांना प्रतिक्रिया विचारल्या असता ते म्हणाले की, केंद्र शासनाने सामान्य नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार केला आहे. याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो. जाणून घेऊना सामान्यजनांच्या प्रतिक्रिया.

Common Mumbaikar
मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

अर्थसंकल्प 2024 विषयी प्रतिक्रिया देताना सामान्य मुंबईकर

मुंबई Budget Reaction : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारनं अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी सरकार गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे. (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत ही घोषणा केली. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, पात्र मध्यमवर्गीयांना स्वतःचं घर विकत घेता यावं किंवा बांधता यावं यासाठी सरकार गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे. सरकार भाड्याची घरे किंवा झोपडपट्टी किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या पात्र मध्यमवर्गीय लोकांना स्वतःचं घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करणार आहे.

अर्थसंकल्पात सामान्य माणसाचा विचार :या अर्थसंकल्पावर सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता ते म्हणाले की, ''सरकारने या अर्थसंकल्पात सामान्य माणसाचा विचार केला आहे. त्याबाबत आम्ही त्यांचे आभार मानतो. एकतर महागाई खूप आहे आणि त्यात जो आपल्या तुटपुंज्या पगारातून टॅक्स भरावा लागतो तो परवडत नाही. त्यामुळे सरकारनं जो सात लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेल्यांना कोणताही टॅक्स लागणार नाही असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरकारचे आभार मानतो.''

महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण घोषणा :या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत ७० टक्के महिलांना घरं दिली जातील अशी देखील घोषणा केली. याबाबत बोलताना राणी बोभाटे यांनी सांगितलं की, ''स्त्री ही ना सासरची असते ना माहेरची. एका स्त्रीचं जगणं काय असतं हे शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे सरकारने महिलांसाठी घरांची विशेष तरतूद केल्यामुळे त्यांना स्वतःचं हक्काचं छप्पर मिळणार आहे. मुंबईसारख्या शहरात महिला काम करतात. आपलं घर सांभाळतात. अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतात. अशात त्या महिलेला स्वतःच्या हक्काचं छप्पर मिळाल्यास ती अधिक सक्षमपणे काम करू शकेल.''

तर लोकशाही अधिक भक्कम होईल :महिला लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात पुढे याव्यात यासाठी संसदेत विशेष कायदा करणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. याबाबत बोलताना सिधिया शेट्टी म्हणाल्या की, ''महिलांची निर्णय क्षमता सक्षम असते. त्या उत्तम शासक, प्रशासक बनू शकतात. आज अनेक आघाड्यांवर महिला यशस्वीरित्या आपलं कर्तृत्व बजावत आहेत. त्यात महिलांना विशेष कायदा करून संसदेत लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास आपली लोकशाही अधिक भक्कम होण्यास आणि जनकल्याणाचे निर्णय घेण्यास हातभार लागेल.''

आम्ही सरकारचे आभार मानतो :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं अंतरिम बजेट हे या मोदी सरकारचं अंतिम बजेट ठरणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याबाबत आम्ही लोकांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ''सरकारनं महिलांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. भविष्यात 2047 पर्यंत आपला देश विकसित देशांमध्ये गणला जाईल. त्यासाठी सरकार योजना देखील राबवत आहे. असं असताना देखील विरोधी पक्ष फक्त टीका करत आहे. त्यांच ते काम आहे. ते टीका करतील. मात्र, आम्ही सरकारनं जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात आमचा विचार करणार आहे. सामान्य माणसाचा विचार करणार आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचे आभारच मानतो.''

हेही वाचा:

  1. आता झेरॉक्सची कटकट मिटणार? गोल्डन डेटाने तुमची कागदपत्रं राहतील सुरक्षित; राज्य सरकारची नवीन योजना
  2. दुसऱ्या कसोटीसाठी सांहेबांचा संघ जाहीर; 41 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश
  3. भारतीय रेल्वेच्या 40,000 बोगी वंदे भारत कोचमध्ये रूपांतरित करणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Last Updated : Feb 1, 2024, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details