महाराष्ट्र

maharashtra

फडणवीस-पवार सरकार टिकलं असतं, परंतु...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा - DCM Devendra Fadnvis

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 10:00 AM IST

Updated : Apr 18, 2024, 5:12 PM IST

DCM Devendra Fadnvis : पुण्यातील एका हॉटेलमध्ये भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. यात बोलताना फडणवीसांनी मोठे खुलासे केले आहेत.

DCM Devendra Fadnvis
48 तासांचं फडवणीस-पवार सरकार टिकलं असतं, परंतु...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचा मोठा खुलासा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे DCM Devendra Fadnvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बारामतीतील भाजपा कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्या समक्ष एका मोठ्या हॉटेलमध्ये बैठक घेतली. त्यात मोठे खुलासे केले असून 48 तासांचं फडणवीस पवार सरकार सुद्धा टिकलं असतं. "अजित पवारांनी म्हटलं होतं की, शरद पवारांनी माझ्यासमोर शब्द दिलाय, मी तुमच्या सोबत आहे. परंतु, शरद पवार साहेबांनी ऐनवेळी माघार घेतली आणि दुर्दैवानं कोर्टाचा निकाल आमच्या विरोधात आला नाही तर तुम्हाला तक्रार करायची वेळ आली नसती, तुमचे प्रश्न तेव्हाच सोडवले असते," असा मोठा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पुण्यातील नगर रोडवरील एका आलिशान हॉटेलमध्ये रात्री उशिरा कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे काही निवडक कार्यकर्त्यांची ही बैठक होती, तसंच जवळपास दीड तास ही बैठक चालू होती.

आपण मोदींसाठी एकत्र : "बारामतीमधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये 25 वर्षे अन्यायाची भावना आहे. निश्चितपणे हा अन्याय झालेला आहे. सत्तेचा गैरवापर झालेला असल्याचं स्पष्ट मत अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत मांडलंय. शेवटी दोन विरोधकांत लढाई लढत असताना एका विरोधकांवर अन्याय होत असतो. त्यामुळं गेल्या 25 वर्षात जे काही झालं ते विसरुन मोदींसाठी आपण एकत्र आलेलो आहोत. बारामतीमध्ये अजित पवार शब्दांचे पक्के आहेत. तसंच यापुढं भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आणि अजित पवारांची आहे. जेवढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय असेल, तेवढाच सगळ्या सत्तेचा भागीदारीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल. त्याचबरोबर जर काही कठीण प्रश्न निर्माण झाले तर मी स्वतः तुम्हाला घेऊन अजित पवारांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवेल," असं आश्वासन सुद्धा या ठिकाणी फडणवीसांनी दिलंय. 'ए फॉर अमेठी बी फॉर बारामती' असं आपलं मिशन आहे. यावेळेस आम्ही आता बारामती जिंकू असं सुद्धा देवेंद्र फडणवीस या बैठकीत म्हणाले.

बिभीषणाला सोबत घ्यावंच लागतं : बारामती लोकसभेत जर पवार कुटुंब सोडून उमेदवार दिला असता, तर लोकांचा विश्वास निर्माण करणं अवघड झालं असतं. लोकांना संभ्रम निर्माण झाला असता आणि ही लढाई खरी वाटली नसती, असा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. त्यामुळं अजित पवारांनी घरातीलच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आता आपल्या सर्वांनी प्रयत्न करून त्यांना निवडून आणावं असंही ते म्हणाले. एखाद्या मोठ्या शक्तीसोबत लढण्यासाठी बिभीषणाला सोबत घ्यावंच लागतं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बैठकीत दिलीय.

माढा आम्हीच जिंकणार : माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची भेट घेतलीय. "उत्तमराव जानकर माझ्याशी काय बोलून गेले हे मी आता सांगणार नाही. परंतु, माढा लोकसभेची जागा आम्हीच जिंकणार," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले; खासदार संजय राऊत यांची टीका - Lok Sabha Election 2024
  2. शिल्पा शेट्टीला धक्का : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं इतक्या कोटींची संपत्ती केली जप्त - ED Attached Shilpa Shetty Property
  3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपाच्या 'नारायण'अस्त्रासमोर शिंदेंच्या आशेचा 'किरण' मावळला - Kiran Samant
Last Updated : Apr 18, 2024, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details