महाराष्ट्र

maharashtra

वर्ध्यात अवकाळी पावसाने घरांची पडझड, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

By

Published : May 16, 2020, 8:39 AM IST

सेलू तालुक्यात 14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंदी रेल्वे महसूल मंडळातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले. पालकमंत्री सुनिल केदार यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

untimely rains in wardha
वर्ध्यात अवकाळी पावसाने घरांची पडझड, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

वर्धा- जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने सिंदी रेल्वे महसुल मंडळात फटका बसला. 8 गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले. या गावातील पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी पाहणी केली. त्यांनी हिंगणघाट मतदारसंघातील चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.

वर्ध्यात अवकाळी पावसाने घरांची पडझड, पालकमंत्र्यांनी केली पाहणी
सेलू तालुक्यात 14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंदी रेल्वे महसूल मंडळातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले. प्राथमिक अंदाजानुसार चानकी -158, कोपरा-110, हिवरा-20, पिंपळगाव-20, वघाळा-20, टाकळी -6, देऊळगाव-3, दिंदोडा-7 या आठ गावातील 344 घरांचे अंशत: नुकसान झाले असून घराचे टीन पत्रे उडालेले आहे. चानकी व कोपरा गावातील नुकसान झालेल्या घरात असलेले धान्य तसेच कापूस ओला झाला. चानकी, कोपरा पिंपळगाव येथील जनावरे जखमी झाली. उर्वरित पंचनामे सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.
वर्ध्यात अवकाळी पावसाने घरांची पडझड, पालकमंत्र्यांनी केली पाहणी
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील जेजुरी येथील गावात नामदेवराव चौधरी यांच्या घराचे पत्र्याचे छत कोलमडून गेले. भिंत पडली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील लोक पंचनामे करण्याची मागणी करत आहेत. यावेळी आमदार समिर कुणावार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार महेद्र सोनवने, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details