महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar On Atiq Ashraf Murder : अतिक- अश्रफ हत्येबाबत शरद पवार म्हणाले...

By

Published : Apr 16, 2023, 4:03 PM IST

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रयागराज येथे काल रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Sharad Pawar On Atiq Ahmed
Sharad Pawar On Atiq Ahmed

प्रतिक्रिया देताना शरद पवार

पुणे :प्रयागराज येथे काल रात्री उशिरा माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या समोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात असतानाच हा हल्ला झाला असून या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आत्ता विविध नेते मंडळी यांच्याकडून मत व्यक्त केली जातं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मला या विषयात बोलायचे नाही. अतिक अश्रफ विषयावर भाष्य करणं योग्य वाटत नाही, असे विधान पवार यांनी व्यक्त केलं आहे.

अतिक अश्रफ विषयावर भाष्य योग्य नाही :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांना विचारलं असता त्यांनी आपल मत व्यक्त केलं. तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हे देखील आंबेगाव गावाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज राज्यात नागपुर येथे महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभा घेण्यात येणार आहे.या सभेत अजित पवार भाषण करणार नाही.अस सांगितल जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की जयंत पाटील यांनी संभाजीनगर येथे भाषण केल नाही. याच अर्थ ते नाराज झाले अस नाही ना विरोधकांना आत्ता अस बोलायचे आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. आंब्याच्या झाडालाच दगड मारतात अस म्हणत सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

खूपच चिंताजनक :अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, काल ज्या प्रमाणे अतिशय वेदनादायक वयलंस दिसला. हे खूपच चिंताजनक होतं. यावर समाजात चर्चा व्हायला हवी. आज आपण कोणत्या दिशेने जात आहोत, याचा विचार करायला पाहिजे. कारण घरात सर्वजण असताना हा व्हिडिओ बघितला गेला याचा अर्थ आपण कोणत्या दिशेने जात आहोत, हे महत्त्वाचं आहे. अस यावेळी सुळे म्हणाल्या. महापालिकेच्या निवडणुका बाबत सुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की निवडणुका होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. सध्या नगरसेवकांना काही काम नसल्याने सध्या काही करत नाही घरचं चांगलं आहे. नशीब सर्वांचे लग्न झालेले आहेत अन्यथा लग्न झाली नसती.अस यावेळी सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - Atiq Ashraf Murder Case : उमेश पाल हत्याकांडाप्रमाणेच अतिक अश्रफ हत्याकांडात ही' आहेत साम्ये

ABOUT THE AUTHOR

...view details