महाराष्ट्र

maharashtra

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : राष्ट्रवादीचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार - पवार

By

Published : Sep 25, 2021, 2:57 PM IST

Updated : Sep 25, 2021, 3:59 PM IST

अजित पवार
अजित पवार ()

राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची कमी-अधिक प्रमाणात ताकद असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीसंदर्भात कोणाशी आघाडी करायची याबाबतचे अधिकार राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिल्ह्याला देण्यात येतात, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिली.

बारामती -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची कमी-अधिक प्रमाणात ताकद असते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीसंदर्भात कोणाशी आघाडी करायची याबाबतचे अधिकार राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिल्ह्याला देण्यात येतात, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिली.

अजित पवार

'प्रत्येकाकडून जागा मिळण्याची अपेक्षा'

राज्यातील काही जिल्ह्यात व शहरात कुठे काँग्रेसची, कुठे शिवसेनेची तर कुठे राष्ट्रवादीची ताकद आहे. अशावेळी प्रत्येकाकडून अधिक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा केली जाते. अशावेळी स्थानिक पातळीवरच याबाबतचा निर्णय होण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्या-त्या जिल्ह्यातील नेत्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील निर्णय सोपवण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा- चहा-भजी विकणारा अल्ताफ बनला आयपीएस अधिकारी!

'महिला अत्याचाराविरोधात लवकरच कायदा'

महिलांवरील अन्याय अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने शक्ती कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा आगामी अधिवेशनापर्यंत अस्तित्वात यावा. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षित वाटेल व चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालता येईल. यासंदर्भात एक समिती नेमली असून त्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा कायदा लवकर अस्तित्वात येण्यासाठी लक्ष घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Last Updated :Sep 25, 2021, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details