महाराष्ट्र

maharashtra

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा खून प्रकरणात वसई पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

By

Published : Nov 21, 2022, 5:34 PM IST

Shraddha Walker Murder Case

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ( Shraddha Walker Murder Case ) पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ( Police laxity in Shraddha Walker murder case ) आरोप होत आहे.

मुंबई -श्रद्धा हत्याकांडाशी ( Shraddha Walker Murder Case ) संबंधित पुराव्याअभावी पालघरच्या माणिकपूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणात सुरुवातीला वसई पोलिसांवर हलगर्जीपणाचा ( Police laxity in Shraddha Walker murder case ) आरोप करण्यात आला होता. 12 ऑक्टोबरपूर्वी माणिकपूर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली नव्हती, महाले डीसीपींच्या मध्यस्थीनंतर तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांचा हलगर्जीपणा :श्रद्धा हत्याकांडप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी आफताबला दोनदा चौकशीसाठी बोलावले, पण 20 दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान आफताबला दिल्लीत जाऊन पुरावे नष्ट करण्यासाठी बराच वेळ मिळाला.

अब्दुल्ला खानचा जबाब : श्रद्धा हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून, दिल्ली पोलिसांच्या पथकाने रविवारी एका गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाचे जबाब नोंदवले. जेथे आरोपी आफताब अमीन पूनावाला त्याच्या कुटुंबासह राहत होता. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने रविवारी पालघर जिल्ह्यातील वसई भागातील युनिक पार्क हाऊसिंग सोसायटीचे सचिव अब्दुल्ला खान यांची एक तासाहून अधिक काळ जबाब नोंदवला.

कुटुंबाने सोडल्याची दिली माहिती - माणिकपूर पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, "पोलिसांनी एक तासाहून अधिक काळ खानची चौकशी केली. श्रद्धा हत्येप्रकरणी त्याचा जबाब नोंदवला." खान यांनी आपल्या जबानीत पोलिसांना सांगितले की, आफताबच्या कुटुंबाने त्यांचे घर सुमारे 20 दिवसांपूर्वी रिकामे केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details